शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

दिवाळीच्या तोंडावर तब्बल 4,532 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:04 IST

विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडली आहे.आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने समाजातील दुर्बल घटकालाही चांगले शिक्षण मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिष्यवृत्ती रखडलेल्यांत एससी प्रवर्गातील ४९५, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील ४ हजार ३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्याना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

एससी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते १०,९९८ अर्ज- एससी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल १० हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ४४९ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर ९ हजार ४४३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी ८ हजार ९५२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, एससी प्रवर्गातील ४९५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते ३१,६९९ अर्ज- ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल ३१ हजार ६९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७ हजार ७५१ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर २७ हजार ६६९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी २३ हजार ६३२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, ४ हजार ३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

शिष्यवृत्तीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने होते. शिवाय शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. प्राप्त अर्जांची छाननी करून शिष्यवृत्तीची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल.- प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त,  समाज कल्याण वर्धा.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती