शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर तब्बल 4,532 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:04 IST

विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडली आहे.आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने समाजातील दुर्बल घटकालाही चांगले शिक्षण मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिष्यवृत्ती रखडलेल्यांत एससी प्रवर्गातील ४९५, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील ४ हजार ३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्याना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

एससी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते १०,९९८ अर्ज- एससी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल १० हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ४४९ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर ९ हजार ४४३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी ८ हजार ९५२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, एससी प्रवर्गातील ४९५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते ३१,६९९ अर्ज- ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल ३१ हजार ६९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७ हजार ७५१ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर २७ हजार ६६९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी २३ हजार ६३२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, ४ हजार ३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

शिष्यवृत्तीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने होते. शिवाय शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. प्राप्त अर्जांची छाननी करून शिष्यवृत्तीची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल.- प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त,  समाज कल्याण वर्धा.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती