शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर तब्बल 4,532 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:04 IST

विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांच्या अडचणीत भर पडली आहे.आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा सुजान नागरिक राहणार असल्याने समाजातील दुर्बल घटकालाही चांगले शिक्षण मिळावे या हेतूने शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. असे असले तरी दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५३२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच रखडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिष्यवृत्ती रखडलेल्यांत एससी प्रवर्गातील ४९५, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील ४ हजार ३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्याना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत ६० टक्के केंद्राचा, तर ४० टक्के राज्य शासनाचा वाटा राहतो. तर केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून शिष्यवृत्तीतील महाविद्यालयाच्या वाट्याची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वळती करण्याचे धोरण अवलंबल्याचे सांगण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा झाल्यावर विद्यालयांना विद्यार्थ्यांकडूनच त्यांच्या वाट्याची रक्कम परत घ्यावी लागणार आहे.

एससी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते १०,९९८ अर्ज- एससी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल १० हजार ९९८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९ हजार ४४९ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर ९ हजार ४४३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी ८ हजार ९५२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, एससी प्रवर्गातील ४९५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गाचे प्राप्त झाले होते ३१,६९९ अर्ज- ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गात शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यात तब्बल ३१ हजार ६९९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २७ हजार ७५१ अर्ज शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर २७ हजार ६६९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. त्यापैकी २३ हजार ६३२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली असून, ४ हजार ३७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

शिष्यवृत्तीचे वितरण ऑनलाईन पद्धतीने होते. शिवाय शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. प्राप्त अर्जांची छाननी करून शिष्यवृत्तीची प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. लवकरच उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होईल.- प्रसाद कुळकर्णी, उपायुक्त,  समाज कल्याण वर्धा.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती