पुरूषोत्तम नागपुरे ल्ल आर्वीसर्वसामान्यांना शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्या रुग्णालयाची संकल्पना अंमलात आणली. मात्र आर्वीतील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ही सेवा ढेपाळली असल्याचे चित्र आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वर्ग एक आणि वर्ग दोनची आठ पदे मंजूर असताना केवळ चार पदे भरली आहेत. ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रमाणकानुसार येथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असणे अनिवार्य असताना येथे अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्याकरिता वरिष्ठांकडे मागणी केली असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात वर्ग तीन व वर्ग चारची २६ पदे मंजूर असताना केवळ २० पदे भरलेली आहे. सहा पदे अद्यापही भरली नसल्याची दिसून येते. येथील काही कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने तेही पदे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त पाणी पिण्यासाठी दोन वॉटर कुलर असून यातील एक नेहमीच नादुरुस्त असल्याची माहिती आहे. पंखे, कुलर्स नादुरुस्त असून रुग्णवाहिका सेवा तात्काळ मिळत नाही. रुग्णवाहिकेसाठी नियमित चालक नसून त्याची कंत्राटी पध्दतीने नेमणूक केल्याची माहिती आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता, या रुग्णालयात दोन रुग्णवाहिका व दोने चालकाची आवश्यक आहे. येथील एक रुग्णवाहिका रुग्णाच्या इलाजासाठी कामी पडत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. या ग्रामीण रुग्णालयात स्टॉकबुकवर औषधाचा साठा असला तरी तो रुग्णांना मिळत नसल्याची ओरड आहे. यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शासनाकडे ताबडतोब पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे. रुग्णालयातील नादुरुस्त पंखे, कुलर्स, वॉटरफिल्टर, बेड त्वरित दुरुस्त करून येणाऱ्या उन्हाळ्यापासून रुग्णांचा बचाव करावा असा प्रश्न आहे. रुग्ण हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून, रुग्णामुळेच ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती झाली आहे. रुग्णांना भेडसाविणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी व त्याला आवश्यक असलेला औषधांचा पुरवठा मिळण्यासाठी स्वत: काळजी घेत आहे. नागरिकांनी समस्या असल्यास संबंधित विभागाकडे लक्ष देण्याची मागणी आहे. - डॉ. नंदकिशोर एम. कोल्हे, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, आर्वी.
कर्मचाऱ्यांअभावी आर्वीची आरोग्यसेवा ढेपाळली
By admin | Updated: February 23, 2016 02:36 IST