शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आर्वी पालिकेच्या कारवाईविरूद्ध न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:26 IST

आर्वी शहरातील डॉ. निरज व संदीप कदम यांच्या एन.एस. अपार्टमेंटचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे म्हणत इमारतीचा वापर त्वरित बंद करण्याचे आदेश आर्वी पालिकेने दिले होते.

ठळक मुद्देनिलेश देशमुख यांची होती तक्रार : शुक्रवारी होणार ‘स्टे’वर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी शहरातील डॉ. निरज व संदीप कदम यांच्या एन.एस. अपार्टमेंटचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे म्हणत इमारतीचा वापर त्वरित बंद करण्याचे आदेश आर्वी पालिकेने दिले होते. यावर स्थगिती मिळविण्यासाठी कदम यांनी न्यायालयात धाव घेतली असून शुक्रवारी निर्णय होणार आहे.एन.एस. अपार्टमेंटच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असताना तळ मजला नियमबाह्य पद्धतीने बॅँकेला भाडे तत्वावर देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी इमारत बांधकाम साहित्य अंगावर पडून आयसीआयसीआय बॅँकेच्या ग्राहकाला इजा झाली होती. याबाबत निलेश देशमुख यांनी आर्वी न.प. कडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेने इमारतीची पाहणी केली असता बांधकामच बेकायदेशीर असल्याचे आढळले. १ नोव्हेंबर रोजी आर्वी नगर परिषदने एन.एस. अपार्टमेंटचे मालक डॉ. निरज कदम यांना तीन दिवसांच्या आत इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते.आर्वी नगर परिषदेच्या या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून डॉ. कदम आणि आयसीआयसीआय बॅँक यांनी १४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्यायालयाकडून दोन्ही डॉ. कदम व नगर परिषदेला नोटीस जारी केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. काय निर्णय होणार, याकडे आर्वीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.बांधकाम सुरू असतानाच डॉ. कदम यांनी तळमजला आयसीआयसीआय बँकेला भाडेतत्वावर दिला. याबाबतच्या तक्रारीवरून पाहणी केली असता बांधकाम नियमबाह्य असल्याचे दिसून आले. यामुळे इमारतीचा वापर बंद करण्याचे आदेश दिले होते. याविरूद्ध त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून नोटीस आला. शुक्रवारी निर्णय होणार आहे.- गणेश शिंदे, मुख्याधिकारी, न.प. आर्वी.