शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्यपालांना पदमुक्त करण्यासाठी आर्वीकर पाठविणार दररोज ६० पोस्टकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 17:33 IST

आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नागरिकांत रोष

आर्वी (वर्धा) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशा आशयाचे पोस्टकार्ड दररोज आर्वीकरांकडून पाठविण्यात येणार आहे. हे अभिनव आंदोलन आर्वीकरांनी सुरू केले असून दररोज ६० पोस्टकार्ड पाठविले जाणार आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रातून १० हजार १०१ पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्वी शहरातून तीन दिवसांपूर्वीच त्याची सुरुवात अंगद कृष्णराव गिरधर आणि मित्रपरिवार यांनी केली आहे. आतापर्यंत ४५० पाेस्टकार्ड पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल नेहमीच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. तसेच आमच्या जाणत्या राजाबद्दल चुकीचे विधान करून आमचे तसेच सर्व महाराष्ट्राचे मन कलुषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना पदमुक्त करा, अशी मागणी पाठविलेल्या पत्रातून करण्यात येत आहे. यापूर्वी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर माजी आमदार अमर काळे यांनी रक्ताने पत्र लिहून राष्ट्रपती यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याचे पत्रातून विनंती केली होती.

आता आर्वी विधानसभा क्षेत्रातून दहा हजार पत्र पाठविण्यात येत आहे. आर्वी शहरातून याची सुरुवात झाली आहे. युवक आणि शहरातील नागरिक दररोज पन्नास ते साठ पत्र लिहून राष्ट्रपतींना पाठवित आहे. जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत पोस्टकार्ड लिहून पाठविण्याचे अभिनव आंदोलन सातत्याने सुरू राहणार आहे.

- अंगद कृष्णराव गिरधर

टॅग्स :Politicsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीarvi-acआर्वीwardha-acवर्धा