शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

राज्यपालांना पदमुक्त करण्यासाठी आर्वीकर पाठविणार दररोज ६० पोस्टकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 17:33 IST

आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नागरिकांत रोष

आर्वी (वर्धा) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, अशा आशयाचे पोस्टकार्ड दररोज आर्वीकरांकडून पाठविण्यात येणार आहे. हे अभिनव आंदोलन आर्वीकरांनी सुरू केले असून दररोज ६० पोस्टकार्ड पाठविले जाणार आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रातून १० हजार १०१ पोस्टकार्ड पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्वी शहरातून तीन दिवसांपूर्वीच त्याची सुरुवात अंगद कृष्णराव गिरधर आणि मित्रपरिवार यांनी केली आहे. आतापर्यंत ४५० पाेस्टकार्ड पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल नेहमीच महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. तसेच आमच्या जाणत्या राजाबद्दल चुकीचे विधान करून आमचे तसेच सर्व महाराष्ट्राचे मन कलुषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांना पदमुक्त करा, अशी मागणी पाठविलेल्या पत्रातून करण्यात येत आहे. यापूर्वी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करून जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर माजी आमदार अमर काळे यांनी रक्ताने पत्र लिहून राष्ट्रपती यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याचे पत्रातून विनंती केली होती.

आता आर्वी विधानसभा क्षेत्रातून दहा हजार पत्र पाठविण्यात येत आहे. आर्वी शहरातून याची सुरुवात झाली आहे. युवक आणि शहरातील नागरिक दररोज पन्नास ते साठ पत्र लिहून राष्ट्रपतींना पाठवित आहे. जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत पोस्टकार्ड लिहून पाठविण्याचे अभिनव आंदोलन सातत्याने सुरू राहणार आहे.

- अंगद कृष्णराव गिरधर

टॅग्स :Politicsराजकारणbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीarvi-acआर्वीwardha-acवर्धा