शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

आर्वी बाजार समितीचा राज्य पणन महासंघाकडे दीड कोटीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:48 IST

आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे.

ठळक मुद्देकृषी तारण योजनेसाठी

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना यावर्षीपासून शेतमाल खरेदीचा जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आर्वीतील व्यापाऱ्यांनी शासनाला जीएसटी रद्द करण्याची विनंती केली आहे. परंतु तसे न केल्यास व्यापारी शेतमाल खरेदी न करता संपावर जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे पाहून आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे. यात शेतकऱ्यांना तारण योजनेतून अधिक रक्कम देता यावी यासासाठी राज्य पणन महासंघाकडे दीड कोटीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.शासनाने शेतमाल खरेदीच्या तोंडावर अडते व व्यापाऱ्यांना पाच टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शासनाच्या निर्णयाविरूद्ध बाजार समितीच्या अडत्यांनी विरोध केला आहे. व या निर्णयाबाबत शासनाने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. परंतु असे न झाल्यास बाजार समितीचे अडते व व्यापारी संपावर जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमिवर आर्वी बाजार समितीत गेल्या तीन दिवसापासून सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. रोज दोन हजार सोयाबीन पोत्यांची आवक बाजार समितीत सुरू आहे. १ आॅक्टोबर पर्यंत आर्वी बाजार समितीत ४०३० सोयाबीन पोत्यांची आवक झाली आहे. यात शेतकऱ्यांना शासनाने पाच टक्के जीएसटी (सेवाकर) लागू केल्याने अडत्यांनी याला विरोध करीत आर्वी बाजार समितीला निवेदन देवून याबाबत शासनाने सोयाबीन खरेदीवर लावलेला सेवाकर तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आर्वी बाजार समितीने कृषी पणन मंडळाची तारण योजना आर्वी तालुका व उपबाजार असलेल्या रोहणा, खरांगणा येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शेतकऱ्यांना २८०० रूपये प्रति क्विंटल भावाने ६५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देऊन या तारण योजनेचा लाभ घेता येईल. यात तारणमध्ये ठेवलेला माल सोयाबीनचे भाव वाढल्यानंतर तारणमधून सोडवून विकण्याची मुभा शेतकऱ्यांना आहे. यातून शेतकऱ्यांना वाढीव बाजार भावाचा लाभ घेता येईल व सणासुदीची आर्थिक अडचण तारण योजनेच्या माध्यमातून भागविता येईल. ही योजना शेतकरी हित लक्षात घेऊन आर्वी बाजार समितीने सुरू केली आहे. तर दुसरीकडे जीएसटीच्या निर्णयामुळे व्यापारी नाखुश असल्याने सोयाबीन खरेदीकडे पाहिजे त्या प्रमाणात व कमी दराने खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. यात जीएसटी लावण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिल्यास अडते संपावर जाण्याची चिन्हे असल्याने यात नाहक शेतकरी भरडल्या जाऊ नये यासाठी आर्वी बाजार समितीची शेतमाल तारण योजना सध्यातरी फायद्याची ठरणार आहे.

आर्वी बाजार समितीने कृषी पणन मंडळाची तारण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरी हिताचा असून व्यापारी अडते यांच्या जीएसटीच्या पार्श्वभूमीवर परिणामकारक ठरणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व शासनाने सेवाकराबाबत तातडीने निर्णय घ्यावा.- विनोद कोटेवारप्रभारी सचिव, बाजार समिती आर्वी.

टॅग्स :Farmerशेतकरी