शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

आर्वीचा अर्जून ठाकूर अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:15 IST

शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ८३.५४ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शैक्षणिक जीवनात भविष्याची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहाव्या वर्गाचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या या निकालात आर्वी येथील कृषक विद्यालयाचा अर्जून प्रफुल्ल ठाकूर जिल्ह्यात अव्वल ठरला. त्याने ९९.२० टक्के (४९६) गुण घेतले.सुशील हिंमतसिंगका विद्यालयाचा क्षितीज गौतम भस्मे हा ९९ टक्के गुण घेवून दुसºया क्रमांकावर राहिला. त्याने ४९५ गुण घेतले. जिल्ह्यातून तिसरा येण्याचा मान आर्वी येथील विद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूल शाळेच्या साक्षी हरिष वडाळकर हिने पटकाविला. तिने ९८.८० टक्के (४९४) गुण घेतले. शिवाय ती जिल्ह्यातून मुलींमधून पहिली ठरली. अग्रगामी हायस्कूल पिपरी (मेघे) येथील अनुजा साटोने ही ९७.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात मुलींमधून दुसरी ठरली.जिल्ह्यातील निकालात मुलींची टक्केवारी ८८.३१ एवढी आहे तर ७९.३७ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात यंदाच्या वर्षाला ८३.५४ टक्के निकाल लागला.जिल्ह्यातील २७९ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांतून एकूण १७ हजार ८९१ मुलांनी परीक्षेचा अर्ज भरला. यात ९ हजार ३६६ मुले आणि ८ हजार ५२५ मुलींचा समावेश आहे. यातील १७ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांपैकी १४ हजार ९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांत ७ हजार ३८५ मुले आणि ७ हजार ८०५ मुलींचा समावेश आहे.एका शाळेचा निकाल शुन्य टक्केजिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचा निकाल शुन्य टक्के लागला. तर भरत दिनांत विद्यालयाचा निकाल जिल्ह्यात सर्वात कमी राहिला. त्याची टक्केवारी १२.५० टक्के एवढी राहिली आहे. 

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८