शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत ‘साहेब बसले उरावर’

By admin | Updated: March 4, 2016 02:07 IST

कारंजा येथील कार नदी प्रकल्पात सुसुंद्रा आणि माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने २० वर्षांपूर्वी हस्तगत केल्या; परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही.

भाजपाचे आंदोलन : कार प्रकल्पातील मोबदला आर्वी : कारंजा येथील कार नदी प्रकल्पात सुसुंद्रा आणि माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने २० वर्षांपूर्वी हस्तगत केल्या; परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शासकीय धान्य गोदामात आर्वीत हमाली कामाचे दर हे हिंगणघाट व वर्धा येथील गोदामापेक्षा अत्यल्प आहे. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामाचे भाव लागू करावे, या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी गुरुवारी ‘साहेब बसले उरावर’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.कारंजा येथे २० वर्षांपूर्वी कार नदी प्रकल्प झाला, कार नदी प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या. सुसुंद्रा व मौजा माणिकवाडा येथील शेतकऱ्यांना २० वर्षे लोटूनसुद्धा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. या मागणीकरिता शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. प्रत्येक आंदोलनाच्यावेळी सदर प्रकरण एक पायरी समोर जात होते. त्यानंतर मात्र सर्व काम ठप्प होत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्याकरिता आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने ‘साहेब बसले उरावर’ हे अभिनव आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक मुखवटे लावून त्यांना खांद्यावर बसवून निदर्शने करीत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मागण्या लवकरात लवकर निकाली न निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे सुधीर जाचक, अरसलान खान, अमित शिंगाने, पुनीत छांगाणी, रामू राठी, दीपक जैसिंगपूरे, मेहबुबभाई, राहुल फुले, बंटी चांदुरकर, स्वप्नील कठाळे, प्रवीण पवार, दिनेश लायचा, विक्रम भगत, चिंटू फुनसे, सुजू कुरील, सागर केचे, शेख वाजिद, रवी गाडगे, निखील भर्रे, मंगेश शिरपूरकर, शब्बीर अहमद, सुमित शिंगाने, गुलशन बरारा, अमर मल्होत्रा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)हमाली दरातील तफावत आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा येथील गोदामात हमाली काम करणाऱ्यांच्या तुलनेत फार कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामात हमाली काम करणाऱ्यांईतकाच मोबदला देण्यात यावा यासाठी हे आंदोलन होते.