शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

आर्वीत ‘साहेब बसले उरावर’

By admin | Updated: March 4, 2016 02:07 IST

कारंजा येथील कार नदी प्रकल्पात सुसुंद्रा आणि माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने २० वर्षांपूर्वी हस्तगत केल्या; परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही.

भाजपाचे आंदोलन : कार प्रकल्पातील मोबदला आर्वी : कारंजा येथील कार नदी प्रकल्पात सुसुंद्रा आणि माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने २० वर्षांपूर्वी हस्तगत केल्या; परंतु त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शासकीय धान्य गोदामात आर्वीत हमाली कामाचे दर हे हिंगणघाट व वर्धा येथील गोदामापेक्षा अत्यल्प आहे. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामाचे भाव लागू करावे, या मागण्यांकरिता भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळा जगताप यांनी गुरुवारी ‘साहेब बसले उरावर’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.कारंजा येथे २० वर्षांपूर्वी कार नदी प्रकल्प झाला, कार नदी प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तगत केल्या. सुसुंद्रा व मौजा माणिकवाडा येथील शेतकऱ्यांना २० वर्षे लोटूनसुद्धा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. या मागणीकरिता शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली. प्रत्येक आंदोलनाच्यावेळी सदर प्रकरण एक पायरी समोर जात होते. त्यानंतर मात्र सर्व काम ठप्प होत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्याकरिता आज भाजपा युवा मोर्चाच्यावतीने ‘साहेब बसले उरावर’ हे अभिनव आंदोलन केले. संबंधित अधिकाऱ्यांचे प्रतिकात्मक मुखवटे लावून त्यांना खांद्यावर बसवून निदर्शने करीत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मागण्या लवकरात लवकर निकाली न निघाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे सुधीर जाचक, अरसलान खान, अमित शिंगाने, पुनीत छांगाणी, रामू राठी, दीपक जैसिंगपूरे, मेहबुबभाई, राहुल फुले, बंटी चांदुरकर, स्वप्नील कठाळे, प्रवीण पवार, दिनेश लायचा, विक्रम भगत, चिंटू फुनसे, सुजू कुरील, सागर केचे, शेख वाजिद, रवी गाडगे, निखील भर्रे, मंगेश शिरपूरकर, शब्बीर अहमद, सुमित शिंगाने, गुलशन बरारा, अमर मल्होत्रा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होते.(तालुका/शहर प्रतिनिधी)हमाली दरातील तफावत आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा येथील गोदामात हमाली काम करणाऱ्यांच्या तुलनेत फार कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे आर्वी येथील शासकीय गोदामात हमाली काम करणाऱ्यांना हिंगणघाट व वर्धा गोदामात हमाली काम करणाऱ्यांईतकाच मोबदला देण्यात यावा यासाठी हे आंदोलन होते.