शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:52 IST

जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसाआड पाणीपुरवठा : अभियंत्याची अरेरावी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्वी नगरपालिकेने काही वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नळ पाणीपुरवठा हस्तांतरित केला मात्र दिवसेंदिवस या जीवन प्राधिकरणाचे ढिसाळ व नियोजन शून्यतेमुळे नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे शहरातील गुरुजी वॉर्ड, विठ्ठल वार्ड, पाण्याच्या टाकी वार्ड, हनुमान वार्ड, खर्डी वार्ड, नेताजी वार्ड , दत्त वार्ड राणी, लक्ष्मीबाई वार्ड, जनता नगर आदी अनेक वार्डात पाण्याची टंचाई सुरू आहे काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात हजारो लिटर पाणी वाया चालले आहेत.याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोटवानी यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता गुरुमुखी यांना फोन करून माहिती दिली. व नागरिकांना पिण्याचे पाण्याबद्दल होणारे हाल सांगितले असता त्यांनाच गुरुमुखी यांनी उलट शब्दात बोलून माझी तक्रार करा तुमच्या ने जे होते ते करून टाका अशी अरेरावीची भाषा वापरली या कार्यालयात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नाही कंत्राटदार यांना मागील चार महिन्यांपासून बिल मिळाले नसल्याने तेही फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम करीत नाही रोजंदारीचे तीन कर्मचारी तेथे राहतात महत्त्वाची बाब अशी की अनेक नागरिकांच्या नळ पुरवठा मिळण्याबाबतचा अर्ज या कार्यालयातून गायब झाले असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र प्राधीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.तीन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवलेआयुष कॉलनीतील मागील तीन महिन्यापासून जलवाहिनी टाकण्यासाठी नाल्या रस्ते खोदून ठेवली आहे परंतु एकही काम पूर्णत्वास गेले नाही शहरातील अनेक वार्डात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पाणी ही आवश्यक सेवा व अविभाज्य घटक असून अनेक वार्डात पाणी मिळत नाही. धड जलवाहिनी टाकण्याचे काम होत नाही येथील जीवन प्राधिकरणचे अभियंता वर्धेला असतात या कार्यालयात कोणीही तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही समस्या कोणाकडे मांडायच्या? अभियंत्याला फोन केला असता ते अरेरावीची उत्तर देतात. वर्धा येथे राहूनच ते सर्व सूत्र हलवतात जर होत नसेल तर नोकरी कशाला करायची? नागरिकांना वेठीस धरण्यास की स्वत:चे हित साधण्यास? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.-सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई