शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:52 IST

जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसाआड पाणीपुरवठा : अभियंत्याची अरेरावी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्वी नगरपालिकेने काही वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नळ पाणीपुरवठा हस्तांतरित केला मात्र दिवसेंदिवस या जीवन प्राधिकरणाचे ढिसाळ व नियोजन शून्यतेमुळे नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे शहरातील गुरुजी वॉर्ड, विठ्ठल वार्ड, पाण्याच्या टाकी वार्ड, हनुमान वार्ड, खर्डी वार्ड, नेताजी वार्ड , दत्त वार्ड राणी, लक्ष्मीबाई वार्ड, जनता नगर आदी अनेक वार्डात पाण्याची टंचाई सुरू आहे काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात हजारो लिटर पाणी वाया चालले आहेत.याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोटवानी यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता गुरुमुखी यांना फोन करून माहिती दिली. व नागरिकांना पिण्याचे पाण्याबद्दल होणारे हाल सांगितले असता त्यांनाच गुरुमुखी यांनी उलट शब्दात बोलून माझी तक्रार करा तुमच्या ने जे होते ते करून टाका अशी अरेरावीची भाषा वापरली या कार्यालयात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नाही कंत्राटदार यांना मागील चार महिन्यांपासून बिल मिळाले नसल्याने तेही फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम करीत नाही रोजंदारीचे तीन कर्मचारी तेथे राहतात महत्त्वाची बाब अशी की अनेक नागरिकांच्या नळ पुरवठा मिळण्याबाबतचा अर्ज या कार्यालयातून गायब झाले असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र प्राधीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.तीन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवलेआयुष कॉलनीतील मागील तीन महिन्यापासून जलवाहिनी टाकण्यासाठी नाल्या रस्ते खोदून ठेवली आहे परंतु एकही काम पूर्णत्वास गेले नाही शहरातील अनेक वार्डात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पाणी ही आवश्यक सेवा व अविभाज्य घटक असून अनेक वार्डात पाणी मिळत नाही. धड जलवाहिनी टाकण्याचे काम होत नाही येथील जीवन प्राधिकरणचे अभियंता वर्धेला असतात या कार्यालयात कोणीही तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही समस्या कोणाकडे मांडायच्या? अभियंत्याला फोन केला असता ते अरेरावीची उत्तर देतात. वर्धा येथे राहूनच ते सर्व सूत्र हलवतात जर होत नसेल तर नोकरी कशाला करायची? नागरिकांना वेठीस धरण्यास की स्वत:चे हित साधण्यास? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.-सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई