शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

आर्वीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:52 IST

जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देतीन दिवसाआड पाणीपुरवठा : अभियंत्याची अरेरावी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : जीवन प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नागरिकात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्वी नगरपालिकेने काही वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना नळ पाणीपुरवठा हस्तांतरित केला मात्र दिवसेंदिवस या जीवन प्राधिकरणाचे ढिसाळ व नियोजन शून्यतेमुळे नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे शहरातील गुरुजी वॉर्ड, विठ्ठल वार्ड, पाण्याच्या टाकी वार्ड, हनुमान वार्ड, खर्डी वार्ड, नेताजी वार्ड , दत्त वार्ड राणी, लक्ष्मीबाई वार्ड, जनता नगर आदी अनेक वार्डात पाण्याची टंचाई सुरू आहे काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याने या उन्हाळ्याच्या दिवसात हजारो लिटर पाणी वाया चालले आहेत.याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोटवानी यांनी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता गुरुमुखी यांना फोन करून माहिती दिली. व नागरिकांना पिण्याचे पाण्याबद्दल होणारे हाल सांगितले असता त्यांनाच गुरुमुखी यांनी उलट शब्दात बोलून माझी तक्रार करा तुमच्या ने जे होते ते करून टाका अशी अरेरावीची भाषा वापरली या कार्यालयात एकही कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नाही कंत्राटदार यांना मागील चार महिन्यांपासून बिल मिळाले नसल्याने तेही फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम करीत नाही रोजंदारीचे तीन कर्मचारी तेथे राहतात महत्त्वाची बाब अशी की अनेक नागरिकांच्या नळ पुरवठा मिळण्याबाबतचा अर्ज या कार्यालयातून गायब झाले असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र प्राधीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.तीन महिन्यापासून रस्ते खोदून ठेवलेआयुष कॉलनीतील मागील तीन महिन्यापासून जलवाहिनी टाकण्यासाठी नाल्या रस्ते खोदून ठेवली आहे परंतु एकही काम पूर्णत्वास गेले नाही शहरातील अनेक वार्डात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पाणी ही आवश्यक सेवा व अविभाज्य घटक असून अनेक वार्डात पाणी मिळत नाही. धड जलवाहिनी टाकण्याचे काम होत नाही येथील जीवन प्राधिकरणचे अभियंता वर्धेला असतात या कार्यालयात कोणीही तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. आम्ही समस्या कोणाकडे मांडायच्या? अभियंत्याला फोन केला असता ते अरेरावीची उत्तर देतात. वर्धा येथे राहूनच ते सर्व सूत्र हलवतात जर होत नसेल तर नोकरी कशाला करायची? नागरिकांना वेठीस धरण्यास की स्वत:चे हित साधण्यास? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.-सुरेश मोटवानी, सामाजिक कार्यकर्ते आर्वी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई