शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

गवंडी व उमरी गावात कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात

कांरजा (घा.) : .तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात गवंडी व उमरीच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची ओरड येथील नागरिक करीत आहे. सभोवतालच्या विहिरी आटल्यामुळे जनतेला दोन दोन किमी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नियमित विद्युत पुरवठा सुरू नसल्यामुळे या कृत्रिम पाणी टंचार्ईला वीज वितरण कंपनीसुद्धा तेवढी जबाबदार असल्याची तक्रार माजी सरपंच नागोराव देवासे यांनी केली आहे.काही वर्र्षापूर्वी उमरी आणि गवंडी या दोन्ही गावांना नारा अधिक २२ या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता. परंतु तांत्रिक दोषामुळे या दोन्ही गावाला नारा अधिक २२ योजनेंतर्गत पुरेसे पाणी पोहचू शकले नाही. त्रस्त नागरिकांनी या दोन्ही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्यावी अशी मागणी केली. पण ही दोन्ही गावे नारा २२ योजनेला जोडली असल्यामुळे स्वतंत्र योजना देता येत नाही असे कारण पाणी पुरवठा विभागाने पुढे केले. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच राहीले.त्रस्त जनतेच्या सतत पाठपुराव्याने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गवंडी साठी २०१२-१३ तर उमरी करिता २०११-१२ मध्ये स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आल्यास योजनेचे काम सुरू झाले. परंतु संबंधित अभियंत्याच्या चालढकल धोरणामुळे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. योजनेला पाहिजे असलेला विद्युत पुरवठाही अद्याप देण्यात आला नाही. परिणामी या दोन्ही गावात भीषण स्वरूपाची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.उमरी ग्रामपंचायतकरिता राष्ट्रीय पेयजल योजना धावसा येथील तलावावरून घेण्यात आली असून गवंडीची योजना मात्र जुन्याच विहिरीवरून सुरू करण्यात आली आहे. जुनी विहीर खोल करून, जुजबी बांधकाम करून नवीन पार्ईप लार्ईन व मोटर पंप मंजूर करण्यात आला. पण अद्याप नवीन ट्रान्सफार्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स न लावल्यामुळे योजनेला वीज पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास दोन्ही गावच्या नागरिकांना सोबत घेवून, आंदोलन करण्याचा इशारा गवंडीचे माजी सरपंच नागोराव देवासे यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)