शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

गवंडी व उमरी गावात कृत्रिम पाणीटंचाई

By admin | Updated: June 16, 2014 23:40 IST

तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात

कांरजा (घा.) : .तालुक्यातील गवंडी आणि उमरी गावाला स्वतंत्र राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली आहे. योजनेचे कामही सुरू झाले आहे. परंतु काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, अभियंत्याच्या दुर्लक्षितपणामुळे मे जून महिन्यात गवंडी व उमरीच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची ओरड येथील नागरिक करीत आहे. सभोवतालच्या विहिरी आटल्यामुळे जनतेला दोन दोन किमी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नियमित विद्युत पुरवठा सुरू नसल्यामुळे या कृत्रिम पाणी टंचार्ईला वीज वितरण कंपनीसुद्धा तेवढी जबाबदार असल्याची तक्रार माजी सरपंच नागोराव देवासे यांनी केली आहे.काही वर्र्षापूर्वी उमरी आणि गवंडी या दोन्ही गावांना नारा अधिक २२ या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता. परंतु तांत्रिक दोषामुळे या दोन्ही गावाला नारा अधिक २२ योजनेंतर्गत पुरेसे पाणी पोहचू शकले नाही. त्रस्त नागरिकांनी या दोन्ही गावाला स्वतंत्र पाणीपुरवठा योजना द्यावी अशी मागणी केली. पण ही दोन्ही गावे नारा २२ योजनेला जोडली असल्यामुळे स्वतंत्र योजना देता येत नाही असे कारण पाणी पुरवठा विभागाने पुढे केले. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच राहीले.त्रस्त जनतेच्या सतत पाठपुराव्याने राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गवंडी साठी २०१२-१३ तर उमरी करिता २०११-१२ मध्ये स्वतंत्र योजना मंजूर करण्यात आल्यास योजनेचे काम सुरू झाले. परंतु संबंधित अभियंत्याच्या चालढकल धोरणामुळे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे. योजनेला पाहिजे असलेला विद्युत पुरवठाही अद्याप देण्यात आला नाही. परिणामी या दोन्ही गावात भीषण स्वरूपाची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.उमरी ग्रामपंचायतकरिता राष्ट्रीय पेयजल योजना धावसा येथील तलावावरून घेण्यात आली असून गवंडीची योजना मात्र जुन्याच विहिरीवरून सुरू करण्यात आली आहे. जुनी विहीर खोल करून, जुजबी बांधकाम करून नवीन पार्ईप लार्ईन व मोटर पंप मंजूर करण्यात आला. पण अद्याप नवीन ट्रान्सफार्मर डिस्ट्रीब्युशन बॉक्स न लावल्यामुळे योजनेला वीज पुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा आणि वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास दोन्ही गावच्या नागरिकांना सोबत घेवून, आंदोलन करण्याचा इशारा गवंडीचे माजी सरपंच नागोराव देवासे यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)