शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

१,१०८ गावात कृत्रिम पाणी टंचाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:10 IST

उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे३.५४ कोटींच्या थकबाकीपोटी कापणार वीज

ऑनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळा येताच पाणी टंचाई डोके वर काढण्याचा प्रकार नित्याचाच आहे. यावर प्रशासनाच्यावतीने उपाययोजना आखण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने झालेल्या दुर्लक्षामुळे तब्बल १,१०८ गावांतील पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा धोक्यात आला आहे. मार्च अखेरीपर्यंत जर या गावांतील पाणी पुरवठा योजनांकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा झाला नाही तर त्यांची वीज कापण्याची तयारी महावितरणच्यावतीने करण्यात आली आहे. यामुळे या गावांत कृत्रिम पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात असलेल्या विविध ग्रामीण पाणी पुरवठा योजनांकडे फेब्रुवारी अखेरपर्यंत ३ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपयांची थकबाबी असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे. त्यांना या देयकाचा भरणा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च देण्यात आली आहे. या दिवसापर्यंत जर ही थकबाकी ग्रामपंचायतींकडून भरण्यात आली नाही तर त्या गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागणार आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेवून नागरिकांकरिता प्रस्तावित असलेली समस्या मार्गी काढण्याकरिता वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे.यापूर्वी थकबाकी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल २५ पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. या ग्रामपंचायतींवर २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. या ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे थकीत असलेल्या देयकाचा भरणा केला नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे या गावातील नागरिकांना दोर बादली घेवून विहिरीवर आणि काहींना जाम झालेल्या हातपंपावर यावे लागले. नागरिकांच्या सुविधेकरिता ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी तत्काळ भरण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात एकूण थकबाकी २६.५७ कोटी रुपयेमहावितरणच्यावतीने जिल्ह्यातील विविध ग्राहकांना वीज पुरवठा करण्यात येतो. यात पाणी पुरवठ्यासह शासकीय कार्यालये, पथदिवे, घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. यापैकी तब्बल ३ लाख ७ हजार ९९७ ग्राहकांकडे एकूण २६ कोटी ५७ लाख ८१ हजार रुपये थकले आहेत. यात सर्वाधिक थकबाकी सार्वजनिक पथदिव्यांची आहे. जिल्ह्यात १४३९ ग्राहकांकडे १९ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये थकले आहेत. तर २ लाख ८१ हजार १२ घरगुती ग्राहकांकडे २ कोटी रुपये थकले आहेत. कृषी पंपांची थकबाकी २ लाख ६२ हजार रुपयांवर आहे. तर १८ हजार ३६७ व्यावसायिक ग्राहकांकडे ९३ लाख ३९ हजार रुपयांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर ग्राहकांवरही मोठी थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत देयकाचा भरणा करण्याच्या सूचना महावितरणने केल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी