शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा(आर्वी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात होणारा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून ठप्प झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे भर उन्हाळ्यात हाल होत असून, नळाला दोन दिवसांपासून पाणी नसल्याने गृहिणींची पाण्यासाठी चांगलीच फजिती होत असल्याचे चित्र आहे.आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो.शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता किंवा इतर कर्मचारी नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोषाचे  वातावरण निर्माण झाले आहे. आधीच रणरणत्या उन्हामुळे घाम फुटू लागला आहे. त्यातच पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे.

सहा वॉर्डात पाणीटंचाईचे चटके-  या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना, तो आमचा प्रश्न नाही, असे म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. -  अनेक वॉर्डात सार्वजनिक नळ व  नागरिकांच्या  घरात नळाला तोट्या नाहीत. -  पाण्याचा अपव्यय होत असताना, दुसरीकडे हमालपुरा, जनतानगर, संजयनगर, साईनगर, वाल्मिक वॉर्ड,   मायबाई वॉर्ड येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

कायमस्वरुपी मुख्याधिकारी हवा...-  शहराची लोकसंख्या ४५ हजारांवर असताना केवळ एकच टँकर आहे. यामुळे पाणीटंचाई भागात नागरिकांना पाणी मिळत नाही. -  कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी सीईओसाहेबांना सांगा, असे सांगून वेळ मारतात. -   देवळीकर यांच्याकडे न.प.चा प्रभार असून, प्रशासकीय अधिकारीही लक्ष देत नसल्याची ओरड आहे.

देऊरवाड़ा  पंप हाऊसमध्ये यांत्रिकी बिघाडामुळे मजीप्रकडून शहराला पाणी पुरवठा झाला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असून, पाण्याचा वापर जपून करावा, नागरिकांनी सहकार्य करावे.  - प्रशांत मूल, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा.

शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी न.प.च्या टँकरने हमालपुरा व जनतानगर येथे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.- सुनील आरिकर, आरोग्य निरीक्षक, न.प.

दोन दिवसांपासून नळाला पाणी नाही. याबाबत पूर्वसूचनाही दिली नाही. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. एकमेव नळाच्या भरवशावर आमचे काम आहे. दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते आहे.- संजय जगताप, नागरिक, जाजूवाडी

 

टॅग्स :water shortageपाणीकपात