शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

आर्वी शहरावर कृत्रिम पाणी टंचाईचे सावट; गृहिणींची झाली फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा(आर्वी) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात होणारा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून ठप्प झाल्याने पाण्याअभावी नागरिकांचे भर उन्हाळ्यात हाल होत असून, नळाला दोन दिवसांपासून पाणी नसल्याने गृहिणींची पाण्यासाठी चांगलीच फजिती होत असल्याचे चित्र आहे.आर्वी शहरातील जनतानगर, एलआयसी कॉलनी, श्रीराम प्राथमिक शाळा येथील जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो.शहरात बारा हजार कुटुंबे असून, त्यापैकी साडेतीन हजारच नळजोडण्या आहेत. उर्वरित सर्व कनेक्शन अवैध आहे. जाजूवाडी येथील जलशुद्धीकरण यंत्रातून तीन जलकुंभात   पाणी जमा होते. त्यानंतर पाण्याचे वितरण जलवाहिनीतून केले जाते. जाजूवाडी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात केवळ एक लिपिक व शिपाई आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता किंवा इतर कर्मचारी नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोषाचे  वातावरण निर्माण झाले आहे. आधीच रणरणत्या उन्हामुळे घाम फुटू लागला आहे. त्यातच पाणीपुरवठा ठप्प असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यांच्यात रोषाचे वातावरण आहे.

सहा वॉर्डात पाणीटंचाईचे चटके-  या सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नगरपालिकेची असताना, तो आमचा प्रश्न नाही, असे म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. -  अनेक वॉर्डात सार्वजनिक नळ व  नागरिकांच्या  घरात नळाला तोट्या नाहीत. -  पाण्याचा अपव्यय होत असताना, दुसरीकडे हमालपुरा, जनतानगर, संजयनगर, साईनगर, वाल्मिक वॉर्ड,   मायबाई वॉर्ड येथे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

कायमस्वरुपी मुख्याधिकारी हवा...-  शहराची लोकसंख्या ४५ हजारांवर असताना केवळ एकच टँकर आहे. यामुळे पाणीटंचाई भागात नागरिकांना पाणी मिळत नाही. -  कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी सीईओसाहेबांना सांगा, असे सांगून वेळ मारतात. -   देवळीकर यांच्याकडे न.प.चा प्रभार असून, प्रशासकीय अधिकारीही लक्ष देत नसल्याची ओरड आहे.

देऊरवाड़ा  पंप हाऊसमध्ये यांत्रिकी बिघाडामुळे मजीप्रकडून शहराला पाणी पुरवठा झाला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असून, पाण्याचा वापर जपून करावा, नागरिकांनी सहकार्य करावे.  - प्रशांत मूल, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, मजीप्रा.

शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याने नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी न.प.च्या टँकरने हमालपुरा व जनतानगर येथे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.- सुनील आरिकर, आरोग्य निरीक्षक, न.प.

दोन दिवसांपासून नळाला पाणी नाही. याबाबत पूर्वसूचनाही दिली नाही. त्यामुळे पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. एकमेव नळाच्या भरवशावर आमचे काम आहे. दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी भरावे लागते आहे.- संजय जगताप, नागरिक, जाजूवाडी

 

टॅग्स :water shortageपाणीकपात