शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

कोटींच्या थकबाकीने महावितरणची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे देयक रखडले : १ हजार ११९ ग्राहकांनीही फिरविली पाठ

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विभागासह आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागातील ग्रामपंचायतीच्या १ हजार ११९ ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेच्या देयकापोटी तब्बल ३ कोटी २५ लाख ५० हजार ९१३ रूपयांची थकबाकी असल्याने महावितरणचीच बत्तीगूल झाली आहे. या देयकांच्या वसुलीकरिता महावितरण कंपनी सरसावली असून ‘थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत करा’ असे धोरण स्वीकारले आहे. याबद्दल ग्रामपंचायतींनाही सूचना दिल्या असून प्रतिसाद मिळाला नाही तर प्रत्यक्ष कारवाई संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहे.पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे. पाणी योजनांची वीज देयक थकीत पडद्यामागचे मूळ संबंधित ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुलीत पाहायला मिळते. काही ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठ्याचे नियोजन अवाक्याबाहेर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे पहावयास मिळते.गावस्तरावर पाणीपट्टी वसुलीत हयगय होत असल्याने वीज देयक भरण्यासाठी ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. मुळात गावांमधील ग्राहकांकडून कडक वसुलीचे धोरण ग्रामपंचायतीने स्वीकारल्यास देयक थकीत पडण्याचे प्रमाणही कमी होईल. परंतु, तसे होताना दिसत नाही.ग्रा.पं.कडे येरझारा, देयक भरण्यास चालढकलदंड, व्याज माफ आणि ५० टक्के रकमेत हप्ते पाडून देण्याची योजना आणली होती. त्याला बहुतांशी ग्रामपंचायतीतून प्रतिसादही मिळाला. परंतु, दोन वर्षापासून यासंदर्भात योजना राबविली नाही. परिणामी, थकबाकीचा आलेख वाढतच गेला. वसुलीसाठी गावागावातील वायरमन ग्रामपंचायतींकडे येरझऱ्या मारतात. परंतु, त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही रक्कम भरली जाते. वीजपुरवठा सुरळीत करून घेतल्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण होते.काही ग्रामपंचायती चालू वीज देयकही भरण्याकडे दुर्लक्ष करतात. थकीत राहू द्या, आपण चालू तरी भरा, अशी महावितरणने कितीही हाक दिली तरीही अशा ग्रामपंचायतींवर कोणताच परिणाम होत नाही. आता थकबाकीची रक्कम ३ कोटीवरे पोहोचल्याने महावितरणने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जात आहेत. प्रतिसाद मिळाला नाही तर नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला जाईल, त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चालू वीज देयकांची वसुली करण्यात येत आहे. जी थकीत रक्कम आहे. त्याची वसुली करण्यासाठी धडक वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. जे ग्राहक थकीत वीज देयके भरणार नाहीत, त्यांची वीज खंडीत करण्यात येईल.डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरण