शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कोटींच्या थकबाकीने महावितरणची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे देयक रखडले : १ हजार ११९ ग्राहकांनीही फिरविली पाठ

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विभागासह आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागातील ग्रामपंचायतीच्या १ हजार ११९ ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेच्या देयकापोटी तब्बल ३ कोटी २५ लाख ५० हजार ९१३ रूपयांची थकबाकी असल्याने महावितरणचीच बत्तीगूल झाली आहे. या देयकांच्या वसुलीकरिता महावितरण कंपनी सरसावली असून ‘थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत करा’ असे धोरण स्वीकारले आहे. याबद्दल ग्रामपंचायतींनाही सूचना दिल्या असून प्रतिसाद मिळाला नाही तर प्रत्यक्ष कारवाई संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहे.पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे. पाणी योजनांची वीज देयक थकीत पडद्यामागचे मूळ संबंधित ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुलीत पाहायला मिळते. काही ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठ्याचे नियोजन अवाक्याबाहेर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे पहावयास मिळते.गावस्तरावर पाणीपट्टी वसुलीत हयगय होत असल्याने वीज देयक भरण्यासाठी ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. मुळात गावांमधील ग्राहकांकडून कडक वसुलीचे धोरण ग्रामपंचायतीने स्वीकारल्यास देयक थकीत पडण्याचे प्रमाणही कमी होईल. परंतु, तसे होताना दिसत नाही.ग्रा.पं.कडे येरझारा, देयक भरण्यास चालढकलदंड, व्याज माफ आणि ५० टक्के रकमेत हप्ते पाडून देण्याची योजना आणली होती. त्याला बहुतांशी ग्रामपंचायतीतून प्रतिसादही मिळाला. परंतु, दोन वर्षापासून यासंदर्भात योजना राबविली नाही. परिणामी, थकबाकीचा आलेख वाढतच गेला. वसुलीसाठी गावागावातील वायरमन ग्रामपंचायतींकडे येरझऱ्या मारतात. परंतु, त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही रक्कम भरली जाते. वीजपुरवठा सुरळीत करून घेतल्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण होते.काही ग्रामपंचायती चालू वीज देयकही भरण्याकडे दुर्लक्ष करतात. थकीत राहू द्या, आपण चालू तरी भरा, अशी महावितरणने कितीही हाक दिली तरीही अशा ग्रामपंचायतींवर कोणताच परिणाम होत नाही. आता थकबाकीची रक्कम ३ कोटीवरे पोहोचल्याने महावितरणने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जात आहेत. प्रतिसाद मिळाला नाही तर नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला जाईल, त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चालू वीज देयकांची वसुली करण्यात येत आहे. जी थकीत रक्कम आहे. त्याची वसुली करण्यासाठी धडक वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. जे ग्राहक थकीत वीज देयके भरणार नाहीत, त्यांची वीज खंडीत करण्यात येईल.डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरण