शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्येच ‘मे हिट’चा तडाखा

By admin | Updated: April 12, 2016 04:25 IST

तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरू लागली आहे. परिणामी, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पारा

वर्धा : तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरू लागली आहे. परिणामी, एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. रविवारी जिल्ह्यात ४३ अंश तापमानाची नोंद झाली. यामुळे एप्रिल महिन्यातच नागरिकांना मे हिटचा तडाखा सोसावा लागत असल्याचे बोलले जात आहे. मार्च महिन्यापासून तापमान वाढायला सुरुवात होते. एप्रिलमध्ये ताममान ३५ ते ३८ अंशांच्या मधे राहते तर मे महिन्याच्या प्रारंभापासून पारा ४० ते ४५ अंशांच्या आसपास असतो, असा अनेक वर्षांपासूनचा अभ्यास आहे; पण या दोन ते तीन वर्षांत एप्रिलमध्येच ४० अंशांच्या वर तापमान पोहोचायला सुरुवात झाली आहे. तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात उष्ण वारे वाहत असल्याने पारा ४० अंशांच्या वर पोहोचला आहे. शनिवारी या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वाधित तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, जे तापमान मे महिन्यात असते, ते एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सहन करावे लागत असल्याने नागरिकही हवालदिल झाले आहेत. परिणामी, मे हिटचा तडाखा एप्रिल महिन्यातच सोसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याचा विपरित परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. यामुळे स्वत:ची काळजी घेत आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे.(शहर प्रतिनिधी)शासकीय रुग्णालयात शीतकक्ष स्थापन४कितीही उन्ह तापत असले तरी नियमित कामे ही करावीच लागतात; पण उन्हाचा तडाखा लक्षात घेता घरून निघताना नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते. धकाधकीच्या जीवनात ही काळजी घ्यायलाही वेळ मिळत नसल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. हीच बाब हेरून शासकीय आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांकरिता शीतकक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा नागरिक व रुग्णांना लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले.पाणी भरपूर पिण्याचा सल्ला४शक्य होईल तेवढा उन्हाचा संपर्क टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे; पण कामे कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी कधीतरी घराबाहेर पडावेच लागते. यामुळे घराबाहेर पडताना भरपूर पाणी प्या, तसेच पाणी नेहमी जवळ बाळगा, असा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जात आहे. सोबतच पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे खाण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. मे महिन्याची आतापासूनच धास्ती४मे महिन्याचं उन्ह एप्रिल महिन्यातच सोसावे लागत असल्याने मे महिन्यात तापमान किती राहील आणि त्याचा सामना कसा करावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचा परिणाम मे महिन्यातील कामांवर होणार असल्याची शक्यता बळावली आहे. गरजेचे नाही, अशी शक्य होईल तेवढी कामे टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष्यांच्या जीवितास धोका४४० अंशावर तापमान गेल्यावरच पक्ष्यांचे हाल व्हायला लागतात. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. अशावेळी त्यांना लवकर पाणी न मिळाल्यास त्यांंंच्या जीवितास धोका होतो. यामुळे प्रत्येकाने घरासमोर, बाल्कनीत पाणी ठेवण्याचे आवाहन पक्षी, प्राणी मित्र करीत आहेत. ४प्राणीदेखील अन्न व पाण्याच्या शोधात दाही दिशा फिरत असतात. अशावेळी कधी-कधी पाण्याच्या शोधात ते खूप दूर निघून गेल्यामुळे रस्ताही विसरतात. परिणामी, सैरावैरा पळत सुटल्याने त्यांचे अपघात होण्याचा धोका हा अधिक असतो. प्राणी आणि पक्ष्यांच्या मृत्यूच्या सर्वाधिक घटना उन्हाळ्यातच घडत असल्याचे पाहावयास मिळते. यामुळे पाणी ठेवणे गरजेचे आहे.