शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

राज्य महामंडळ व समित्यांवरील नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: April 10, 2015 01:48 IST

राज्यातील विविध क्षेत्रात विकासाची सार्वजनिक आरोग्य, जल:निसारण, गरीबांना घरे, आर्थिक मदत विविध कामांसाठी राज्यात जवळपास ५५ महामंडळांचे गठण होते.

प्रभाकर शहाकार पुलगाव राज्यातील विविध क्षेत्रात विकासाची सार्वजनिक आरोग्य, जल:निसारण, गरीबांना घरे, आर्थिक मदत विविध कामांसाठी राज्यात जवळपास ५५ महामंडळांचे गठण होते. शिवाय जिल्हा व तालुकास्तरावर ४६ समित्या आहेत. राजकीय पक्षाची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार या महामंडळ किंवा समित्यांवर नियुक्ती होते; परंतु आघाडीचे शासन असताना या कार्यर्त्यांना नियुक्त्या न करताना ताटकळत ठेवले. आता सत्तेवरील युतीचे शासनही आपल्या कार्यकर्त्यांना ताटकळतच ठेवणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात याचा प्रत्यय आलेला आहे.राज्यात विदर्भ वैधानिक विकास महामंडळ वस्त्रोद्योग, महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ, लघु उद्योग महामंडळ, गृहनिर्माण महामंडळ, जल:निसारण महामंडळ, कृष्णा खोरे, विकास महामंडळ यासारख्या जवळपास ५५ महामंडळाच्या माध्यमातून राज्याची विविध प्रकारची विकास कामे व आर्थिक उलाढालीची कामे चालतात. या महामंडळावर काही अशासकीय सदस्य म्हणून सत्तेवर असणारा पक्ष आपल्या योग्य कार्यकर्त्यांना नियुक्त करतो. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रोजगार, स्वयं रोजगार समिती, जिल्हा शिक्षण सल्लागार समिती, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती, हुंडा निर्मूलन दक्षता समिती, संजय गांधी निराधार समिती यासारख्या जिल्हा व तालुकास्तरीय अशा जवळपास ४६ समित्या आहेत. राज्य महामंडळ व या समितीचा विचार केल्यास प्रत्येक जिल्ह्यात जवळपास १०० कार्यकर्त्यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करणे शक्य आहे.गत काही वर्षांत सत्तेवर असणाऱ्या आघाडी सरकारने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांना महामंडळे दिलीत. मागील दशकात आघाडीने व काही घटक पक्षांनी आमदारांना आमदारच राहू द्या, अशी घोषणा केली तर कुणी महामंडळावर आमदारऐवजी आपल्या कार्यकर्त्यांचीच नियुक्ती करण्याचे संकेत दिले; परंतु आघाडी शासनाने अनेक वर्षांत कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानेच पुसली. पक्षाची निवडणूक असो, प्रचार असो की सभा सतत धावपळीत असणारा कार्यकर्ता या गोष्टीपासून वंचितच राहिला. आपली सत्ता टिकविण्यासाठी व आमदारांना खुश करण्यासाठी महामंडळे वाटण्यात आल्याचा आरोप होत आहे. तीच स्थिती सत्तेत युती शासन आल्यावर दिसत आहे. केंद्रात भाजपा युतीचे शासन सत्तेवर येवून जवळपास आठ महिने लोटले तरी राज्यात पाच होत आहेत. सत्तेवर असणारी मंडळी सत्तेचा पुरेपूर उपयोग घेत आहे. सर्व सामान्य कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्या घराचे उंबरठेच झिझवत आहे. आघाडी प्रमाणे युतीचे शासनही आपल्या कार्यकर्त्यांना ताटकळतच ठेवणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांत चर्चेला जात आहे.