शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता स्वामीनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: February 29, 2016 01:41 IST

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर स्वामीनाथन आयोग लागू करण्याशिवाय पर्याय नाही.

रामदास तडस : विदर्भ प्रदेश विकास परिषदेचा मेळावावर्धा : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर स्वामीनाथन आयोग लागू करण्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ विकासासाठी विविध स्तरावर काम करणाऱ्या सर्व संघटनांनी एकत्रित लढा उभारण्याची गरज खा. रामदास तडस यांनी व्यक्त केली. सावंगी (मेघे) येथील सभागृहात रविवारी आयोजित विप्रवि परिषदेच्या जिल्हास्तरीय मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, यासाठी विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधींनी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मेघे यांनी या मेळाव्यात केले. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, तुमसर येथील आ. चरण वाघमारे, जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे, ज्येष्ठ कृषी अभ्यासक प्रा. शरद पाटील, जनमंचचे संस्थापक अ‍ॅड. अनिल किलोर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, गिरीधर राठी, विप्रवि परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांची उपस्थिती होती. विदर्भातील अन्यायाचे खापर इतरांच्या माथी फोडण्यापेक्षा जनप्रतिनिधींना जाब विचारायची सवय स्वत:ला लावून घ्या विदर्भाचा विकास झाला नसेल तर त्याला आम्हीच कारणीभूत आहोत, अशा स्पष्ट शब्दात प्रा. शरद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करतानाच त्यांनी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गैरराजकीय संघटनांनी एकत्र येवून जनसामान्यांचा दबाव गट निर्माण करावा, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. जनमंचचे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी, स्वातंत्र विदर्भराज्य व्हावे, ही इथल्या जनतेचीच मागणी आहे, हे यापूर्वी घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे मत मांडले. विदर्भाच्या नैसर्गिक समृध्दीबाबत सांगतानाच सरकारी धोरणांनी विदर्भवासीयांची कशी गळचेपी केली, याचीही साधार मांडणीही त्यांनी केली. आज केंद्रात भाजपाचे सरकार बहुमतात असून या सरकारने निर्णय घेतल्यास स्वातंत्र विदर्भराज्य निर्मितीला कोणीही थांबवू शकत नाही. केंद्र सरकारने आता आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे, असेही अ‍ॅड. किलोर म्हणाले. या मेळाव्यात आ. पंकज भोयर, आ. कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, राजेश बकाणे यांनीही मार्गदर्शन केले. विदर्भ प्रदेशाकरिता दशसूत्री कार्यक्रम दत्ता मेघे : विदर्भ विकास परिषदेचा मेळावावर्धा : मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात दत्ता मेघे यांनी विप्रवि परिषदेद्वारे सर्व जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या दशसूत्री कार्यक्रमाबाबतही माहिती दिली. येत्या वर्षभरात विदर्भाची बाजू मांडणाऱ्या व नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या पाच हजार प्रशिक्षित सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण विदर्भात निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही मेघे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजू मिश्रा यांनी केले. मेळाव्याची भूमिका विलास कांबळे यांनी मांडली. मंचावर जि.प. सदस्य राणा रणनवरे, अरुण उरकांदे, मंदा चौधरी, सुनीता ढवळे, नितीन देशमुख, दिलीप अग्रवाल, प्रदीप ठाकूर, जयंत गोमासे, अशोक कलोडे, साधना सराफ, महेश पुरोहित, बबलू गौतम, विजय घाडगे, मेहमूद अंसारी, नरेंद्र पांडे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमल कुलधरिया, ं अभ्युदय मेघे, संतोष ठाकूर, प्रशांत बुरले, हरीश दिंकोडवार, दादा बांगडे, शाबीर कुरेशी, कापसे, दोड आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातून परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाकरिता पाच हजार प्रशिक्षित कार्यकर्ते वेगळ्या विदर्भाकरिता नागरिकांत चेतना निर्माण करण्याकरिता व विदर्भाची बाजू मांडणाऱ्या नागरिकांना मदतीचा हात देण्याकरिता पाच हजार प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण विदर्भात निर्माण करण्याची यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय वेगळ्या विदर्भाकरिता राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची भूमिका ठरविण्यात आली असून सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.