शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा

By admin | Updated: November 23, 2015 01:52 IST

शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी ..

कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष समिती आणि जनमंचच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या दोन संस्थानी सुद्धा सदर आंदोलन तीव्र करण्यासाठी मदतीचा हात समोर केला आहे. कारंजा तालुक्यातूनही शेतकरी हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करण्यासाठी जोर वाढू लागला आहे. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी अमरावती येथे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक हजार भूमिपुत्रांनी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या अधीपत्याखाली एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. अनिल किल्लोर, अविनाश जोगदंड, आपुलकीचे संस्थापक अध्यक्ष व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे मुख्य प्रेरक अभिजीत फाळके, अमिताभ पावडे, गिरीधर पाटील, गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व शेतकरी आत्महत्या यावर प्रकाश टाकून, उपाययोजना सुचविल्या. यावेळी या सर्व समस्याची उकल असणारा स्वामीनाथन आयोग, शासनाने त्वरित लागू करावा, अशी आग्रही भूमिकाही मांडण्यात आली.त्यानंतर हाच वसा धरून ३० आॅक्टोबरला जनमंच व भूमिपूत्र संंघर्ष वाहिनीने प्रत्येक जिल्हा व तालुका स्थळी आंदोलन करुन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी रामबाण असलेला ‘स्वामीनाथन आयोग’ लागू करा, अन्यथा आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. लोकमतच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. या चर्चेत ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ आणि ‘अलग अँगल’ या संस्थानी सक्रीय सहभाग घेवून हा आयोग शासनाने त्वरीत लागू करावा नशी मागणी केली. तसेच ७ डिसेंबरला ग्राम आर्ट प्रोजेक्टरच्या संचालिका श्वेता भट्टड ‘भारत मातेच्या’ वेशात स्वत:ला जमिनीमध्ये गाडून घेणार आहेत. श्रमिक एल्गार चंद्रपूरच्या पारोमिता गोस्वामीही या आंदोलनात सक्रीय राहणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)