शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा

By admin | Updated: November 23, 2015 01:52 IST

शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी ..

कारंजा (घा.) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि आत्महत्या याची तर्कशुद्ध आणि तत्वशुद्ध उकल करणारा स्वामीनाथन आयोग संयुक्तपणे शासनाला जागे करण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष समिती आणि जनमंचच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ व ‘अलग अँगल’ या दोन संस्थानी सुद्धा सदर आंदोलन तीव्र करण्यासाठी मदतीचा हात समोर केला आहे. कारंजा तालुक्यातूनही शेतकरी हिताचा असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत लागू करण्यासाठी जोर वाढू लागला आहे. ८ आॅक्टोबर २०१५ रोजी अमरावती येथे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक हजार भूमिपुत्रांनी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीच्या अधीपत्याखाली एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. अनिल किल्लोर, अविनाश जोगदंड, आपुलकीचे संस्थापक अध्यक्ष व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे मुख्य प्रेरक अभिजीत फाळके, अमिताभ पावडे, गिरीधर पाटील, गजानन अमदाबादकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व शेतकरी आत्महत्या यावर प्रकाश टाकून, उपाययोजना सुचविल्या. यावेळी या सर्व समस्याची उकल असणारा स्वामीनाथन आयोग, शासनाने त्वरित लागू करावा, अशी आग्रही भूमिकाही मांडण्यात आली.त्यानंतर हाच वसा धरून ३० आॅक्टोबरला जनमंच व भूमिपूत्र संंघर्ष वाहिनीने प्रत्येक जिल्हा व तालुका स्थळी आंदोलन करुन अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी रामबाण असलेला ‘स्वामीनाथन आयोग’ लागू करा, अन्यथा आंदोलन अधीक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. लोकमतच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. या चर्चेत ‘ग्राम आर्ट प्रोजेक्ट’ आणि ‘अलग अँगल’ या संस्थानी सक्रीय सहभाग घेवून हा आयोग शासनाने त्वरीत लागू करावा नशी मागणी केली. तसेच ७ डिसेंबरला ग्राम आर्ट प्रोजेक्टरच्या संचालिका श्वेता भट्टड ‘भारत मातेच्या’ वेशात स्वत:ला जमिनीमध्ये गाडून घेणार आहेत. श्रमिक एल्गार चंद्रपूरच्या पारोमिता गोस्वामीही या आंदोलनात सक्रीय राहणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)