शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडव्यांना माफी; शेतकऱ्यांना का नाही?

By admin | Updated: November 18, 2016 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करीत सामान्य, शेतकरी, मजुरांच्या बँकेतील रकमेवर कठोर नियंत्रण लादले.

समता परिषदेचा सवाल : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला निवेदनवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करीत सामान्य, शेतकरी, मजुरांच्या बँकेतील रकमेवर कठोर नियंत्रण लादले. आर्थिक आणीबाणी लादली. नागरिक हक्काच्या पैशासाठी बॅकांसमोर हतबलपणे उभे आहे. सामान्यांना पैशासाठी ताटकळावे लागत असताना उद्योगांच्या नावावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडविणाऱ्यांना मात्र कर्जमाफी देण्यात आली. कर्जबुडव्यांना माफी दिली जाते तर मग, शेतकऱ्यांना का नाही, असा संतप्त सवाल म. फुले समता परिषदेने केला आहे. याबाबत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.अनेक उद्योगपतींनी हजारो कोटींचे कर्ज उचलून बँकांची फसवणूक केली. ते पैसे बेकायदेशीरपणे अन्यत्र पळविले. त्यातून हजारो कोटींची काळी माया जमविली. त्या ‘डिफॉल्टर’ उद्योपतींची ईडीमार्फत चौकशी करणे, सरकारी बँकांचे पैसै वसूल करीत त्यांना तुरूंगात टाकण्याऐवजी त्यांना कर्जमाफी दिली जात आहे. देशाच्या सर्वात मोठ्या सरकारी मालकीच्या स्टेट बँक आॅफ इंडियाने मोदी सरकार व रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार सहेतुक कर्जबुडव्या उद्योगपतींचे तब्बल ४८ हजार कोटींचे कर्ज सपशेल माफ केले. विविध बँकांची फसवणूक करून कर्ज बुडवून परदेशात पळालेल्या व सरकारने आंतरराष्ट्रीय वॉरंट काढून भारतात पकडून आणण्यासाठी आवाहन केलेल्या गुन्हेगार विजय माल्या याला तब्बल १ हजार २०१ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला दीडपट भाव देण्याची आश्वासने हवेत विरली. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यास पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे, असा आरोपही केला. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे ३५ हजार कोटी रुपयांचे सर्व बँकांचे कर्ज त्वरित माफ करावे, अशी मागणी समता परिषदेने केली. यावेळी प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, कविता मुंगले व पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)भाजप सरकारचा नोंदविला निषेधशेतकऱ्यांबाबत संवेदना शून्य झालेल्या भाजपच्या सरकारांनी त्यांची साक्ष दखलही घेतली नाही. समता परिषदेने शेतकरी विरोधी सरकारी राजवटीचा जाहीर निषेध केला. शेतकरी आत्महत्या हे या सरकारचेच पाप असल्याने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज त्वरित माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली.