शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

डेंग्यूने केळापुरात घेतला आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:40 IST

कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. सकारात्मक चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

ठळक मुद्देसंतप्त ग्रामस्थांचा जिल्हा परिषद अध्यक्षांना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेला आरोग्य विभाग डेंग्यू या किटकजन्य आजाराला वेळीच आळा घालण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केळापूर येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी योग्य कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. सकारात्मक चर्चेअंती संतप्त आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.केळापूर या गावात प्रत्येक घरी डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झालेले रुग्ण दिसून येतात. यापूर्वी डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याने तेथे काही जणांना प्राण गमवावे लागले आहे. असे असताना ठिकठिकाणी अडणारे सांडपाणी आणि ठिकठिकाणी साचनारे पावसाचे पाणी यासंदर्भात तेथील ग्रा.पं. प्रशासन व जि.प.चा आरोग्य विभाग योग्य पाऊल उचलताना दिसत नाही. याच पाश्वभूमिवर डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाल्याने विजय मुंजेवार (२६) रा. केळापूर याला सुरूवातीला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर वार्ता गावात माहिती होताच संतप्त ग्रामस्थांनी वर्धा शहर गाठून जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांना त्यांच्याच दालनात घेराव घातला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केळापूर गावात प्रत्येक घराच्या आवारात शोषखड्डे तयार करावे. नागरिकांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या ग्रामसेविका जीवतोडे यांची तात्काळ बदली करण्यात यावी. मुंजेवार कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात यावी. केळापूरातून डेंग्यू या आजाराला हद्दपार करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात यावे, शिवाय गावातील शेणखताची ढिगारे वेळीच उचलण्यात यावे, आदी मागण्या याप्रसंगी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांच्याकडे केल्या. याप्रसंगी जि.प. सदस्य विजय आगलावे, राणा रणनवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न केल्यास ग्रा.पं.चे कामकाज ठप्प करू. शिवाय वेळप्रसंगी ग्रा.पं. कार्यालयालाच कुलूप लावू असा इशारा निवेनातून दिला आहे. आंदोलनात संजीवनी बोरकर, कुसुम मानकर, रंजना मानकर, रंजना कांबळे, ज्योत्स्रा थूल, संजय थूल, संगीता ढोणे, प्रकाश चावके, बेबी भोयर, चंदा भोयर, सुनीता भोयर, प्रतीभा हांडे, मिना मसराम, अनिल नैताम यांच्यासह केळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ग्रामसेविकेची हकालपट्टी करण्याची रेटली मागणीकेळापूर येथील जीवतोडे नामक ग्रामसेविका यांना शासनाच्या कुठल्याही योजनेची माहिती विचारली असता त्या नागरिकांना माहिती देत नाहीत. इतकेच नव्हे तर त्या ग्रामस्थांना सौजन्याची वागणूक देत नाही असा आरोप करीत त्याची तात्काळ बदली करण्यात यावी. तसेच त्यांच्या जागेवर त्वरित कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणीही यावेळी संतप्त ग्रामस्थांनी लावून धरली होती. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन योवळी जि.प. अध्यक्ष मडावी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.