शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

आॅनलाईन कार्यपध्दती ठरते त्रासदायक

By admin | Updated: June 22, 2017 00:39 IST

नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे.

दाखल्यांकरिता पालकांची धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रवेशाकरिता लागणारे दाखले व कागदपत्रे मिळविताना पालकांना मात्र चांगलीच पायपीट करावे लागत आहे. सर्व शासकीय सेवा आॅनलाईन करण्यात आल्या असून लिंक फेल असल्यास कागदपत्र मिळत नाही. सद्यस्थितीत आॅनलाईन प्रणाली नागरिकांकरिता डोकेदुखीची ठरत आहे. येथील नायब तहसीलदार कार्यालयात श्रावळबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकूल योजनेचे लाभार्थी, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमीलेअर दाखला, शेतीचा फेरफार, सातबाराचा उतारा याकरिता विद्यार्थी, पालकांसह शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कधी नायब तहसीलदाराची अनुपस्थिती तर कधी लालफितशाहीचे धोरण यामुळे या कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. प्रशासनातील सर्व सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. प्रवेश परीक्षेचे अर्ज असो किंवा नोकरीचा अर्ज, पोलीस स्टेशनची तक्रार असो किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज, सातबाराचा उतारा देखील आॅनलाईन मिळतो. याकरिता नायब तहसीलदार कार्यालयात ग्रामदुत सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवा केंद्रात अत्याधुनिक सुविधा असून आवश्यक दस्ताऐवज मिळविता येतात. विविध प्रमाणपत्रासाठी शासकीय नियमानुसार शुल्क आकारले जाते. मात्र येथील सेतू केंद्रात नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारण्यात येत असल्याची ओरड पालक करीत आहे. या संदर्भात नायब तहसीलदार उल्हास राठोड यांच्यासोबत चर्चा केली असता शासकीय शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारले जात होत असेल तर कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आॅनलाईन सेवेतील व्यत्ययामुळे नागरिकांची डोकेदुखी कमी होत नसल्याचे दिसते. नागरिकांना मनस्ताप शाळा प्रवेशासाठी प्रवेश अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडावी लागतात. याकरिता तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उबंरठे झिझवावे लागत आहे. आॅनलाईन सेवा सुरू करुनही हा प्रकार कायम आहे. आॅनलाईन कार्यपध्दतीमुळे कागदपत्र मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.