शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

१,३४० गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर

By admin | Updated: April 1, 2016 02:19 IST

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शेतकऱ्यांना सर्वच सुविधा मिळणार वर्धा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता. अशात मध्यंतरी शासनाने वर्धा जिल्ह्यातील एकही गावात दुष्काळ नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर होता. आता मात्र शासनाकडून जिल्ह्यातील १ हजार ३४० गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.जिल्ह्यात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे २० आॅक्टोबर २०१५ च्या शासननिर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या सर्वच सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय २३ मार्च २०१६ रोजी निर्गमिक करण्यात आला आहे. खरीप, रब्बी हंगामातील पैसेवारी पन्नास पेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध योजना शेतकऱ्यांकरिता देण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१५-१६ या वर्षातील खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये वर्धा तालुक्यातील १५४ गावे, सेलू तालुक्यातील १६७, देवळी १४९, हिंगणघाट १८७ गावे, समुद्रपूर २१९, आर्वी २०८ गावे, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावे अश्ी एकूण १ हजार ३४० गावांचा समावेश आहे. या गावांना सर्वच सुविधा मिळणार आहे.(प्रतिनिधी)