शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

१,३४० गावांमध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर

By admin | Updated: April 1, 2016 02:19 IST

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : शेतकऱ्यांना सर्वच सुविधा मिळणार वर्धा : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी पन्नासपेक्षा कमी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे सादर केला होता. अशात मध्यंतरी शासनाने वर्धा जिल्ह्यातील एकही गावात दुष्काळ नसल्याचे जाहीर केले होते. यामुळे जिल्ह्यात नाराजीचा सूर होता. आता मात्र शासनाकडून जिल्ह्यातील १ हजार ३४० गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.जिल्ह्यात नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळ सदृश्य स्थितीमुळे २० आॅक्टोबर २०१५ च्या शासननिर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या सर्वच सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पन्नास पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना जाहीर करण्यासंदर्भातील शासन निर्णय २३ मार्च २०१६ रोजी निर्गमिक करण्यात आला आहे. खरीप, रब्बी हंगामातील पैसेवारी पन्नास पेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध योजना शेतकऱ्यांकरिता देण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१५-१६ या वर्षातील खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये वर्धा तालुक्यातील १५४ गावे, सेलू तालुक्यातील १६७, देवळी १४९, हिंगणघाट १८७ गावे, समुद्रपूर २१९, आर्वी २०८ गावे, आष्टी १३६, कारंजा तालुक्यातील १२० गावे अश्ी एकूण १ हजार ३४० गावांचा समावेश आहे. या गावांना सर्वच सुविधा मिळणार आहे.(प्रतिनिधी)