शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी शाळा-मैदानात RSS वर बंदी घाला! खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस म्हणाले, "अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
4
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
5
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
6
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
7
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
8
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
9
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
10
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
11
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
12
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
13
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
14
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
15
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
16
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
17
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
18
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
19
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
20
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...

१,३४० गावांत दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: March 18, 2016 02:19 IST

जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांंची पैसेवारी ५० च्या वर घोषित केली.

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : विविध संघटनांकडून शासनाला निवेदन वर्धा : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांंची पैसेवारी ५० च्या वर घोषित केली. ही पैसेवारी म्हणजे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आघात असल्याचा आरोप करीत ती रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीकरिता गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी आंदोलने करीत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवदेन सादर केले. आज किसान अधिकार अभियान, महात्मा फुले समता परिषदेने जिल्हाधिकारी व माजी आमदार राजू तिमांडे यांनी हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात जिल्ह्यात सर्वच १,३४० गावांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी वर्धा यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेली सुधारित व अंतिम पीक पैसेवारी ५० च्या आत होती. जिल्ह्यातील जवळपास ४० टक्के शेतकऱ्यांचे संपूर्ण सोयाबीनचे उत्पादन नापिकीत गेले. ९० टक्के कोरडवाहू कपाशीत शेतकऱ्याला शेवटी पावसाअभावी उत्पादनच झाले नाही. आत्तापासून जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. गत १५ वर्षांच्या कालावधीत वर्धा जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत व सुरू वर्षात रोज एक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात होत आहे, हे ही सरकारने समजून घेण्याची गरज या निवेदनातून करण्यात आली आहे. शासनाने ११ मार्च २०१६ रोजी प्रकाशित केलेल्या शासकीय पत्रकात कमी पैसेवारी व दुष्काळ प्रवण भागातील शासकीय मदतीच्या निकषांमध्ये जिल्हा संपूर्णपणे वगळण्यात आला आहे. हे शेतकऱ्यांना न कळणारे आहे. हा आदेश काढताना जून्याच प्राथमिक पीक पैसेवारीचे आकडे यात घेतल्याचा आरोप किसान अधिकार अभियानने केला आहे. ही चूक दुरूस्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सलील यांनी जानेवारी २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या सुधारित पैसेवारी नुसार संपूर्ण जिल्हा टंचाई ग्रस्त घोषित करण्यात यावा व त्यासंबधाने सर्व शासकीय योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेता यावा याकरिता हा निर्णय परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास या विरोधात आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देताना अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे, जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, अध्यक्ष भाऊराव काकडे, देविदास गोटेफोडे, पांडुरंग डहाके, अरुण खडतकर, बाबा ठाकरे, मंगेश शेंडे, तन्मय जोशी, प्रमोद हजारे यांच्यासह अभियानच्या सदस्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)शासनाचा हा निर्णय पक्षपातीच-समता परिषदेचा आरोपवर्धा - महाराष्ट्र शासन हे केवळ उद्योगपती आणि व्यापारी धार्जीने सरकार आहे, हे पुन्हा शासनाने जाहीर केलेल्या पक्षपाती दुष्काळी जिल्ह्यामधून दिसून आल्याचा आरोप समता परिषदेने केला आहे. जिल्ह्यात दुष्काळ असताना भाजपा शासनाच्यावतीने जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचा आदेशित केले आहे. हा आदेश रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्राना निवदेनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. निवदेन देताना समता परिषदेचे विभागीय संघटक दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, निळकंठ राऊत, निळकंठ पिसे, अभय पुसदकर, भरत चौधरी, प्रदीप डगवार, किशोर तितकरे, गजानन देशमुख, रामजी कुबडे, संजय मस्के, सुरेश सातोकर, संजय भगत, जयंत भालेराव, सुनील पाटील, चंद्रकांत भोयर इत्यादी उपस्थित होते. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्याहिंगणघाट - जिल्हा दुषकाळग्रस्त जाहीर करुन सरकारने शेतकऱ्यांना एकरी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करून छावण्या उभारण्यात याव्या. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे सरसकट पुर्णगठन करण्यात यावे, बँकेची सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीज देयक माफ करण्यात यावे, कृषी पंपाचे भारनियमन कमी करण्यात यावे, या मागणीचे निवेदन माजी आमदार राजू तिमांडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केले.जिल्ह्याची पैसेवारी ५० टक्यांच्या आत आहे असे जिल्हाधिकारी वर्धा यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी यांनी पाठविलेला अहवाल शासनाने अमान्य करून १३४० गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले. गत चार वर्र्षांपासून सतत दुष्काळाच्या छायेत अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांची ही थट्टाच असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.