शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:46 IST

बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले.

ठळक मुद्देभाव मिळत नसल्याने टाळला मळणीचा खर्च : शेतकºयांच्या आर्थिक अडचणींत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले. सवंगणीच्या कामावर झालेला खर्च निरर्थक गेला. आता मळणीवर खर्च करायचा नाही, असे भूमिका घेत शेतकºयाने सोयाबीन गुरांना चारले.सेलूच्या उपबाजार समितीमध्ये काळसर पडलेल्या सोयाबीनला २०० रुपये क्विंटलच्या भावात मागणी करण्यात आली होती. या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता सेलू तालुक्यातील घोराड या गावातील शेतकरी बंडू शंकरराव तडस यांनी सोयाबीनचे पीक गुरांच्या स्वाधीन केले आहे. सोयाबीनची सवंगणी करून त्यांनी पीक शेतातच ढीग लावून ठेवले होते. सर्व ढीग उचलून एकत्र करणे आणि मळणी यंत्रातून सोयाबीन काढणे, ही प्रक्रिया शिल्लक होती. बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांकडे लक्ष ठेवणाºया शेतकºयाने सोयाबीनचा रविवारचा भाव पाहिला व पीक गुरांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे पीक खराब झाले होते. शेंगांतील दाणे काळे पडले असल्याने बाजारपेठेत त्या सोयाबीनची कवडीमोल भावात मागणी होईल. ही मागणी आपल्याला व्यथित करणारी ठरेल. यापेक्षा आपल्या गुरांच्या पोटाची खळगी या पिकाने का भरू नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.मागील वर्षीही काही शेतकºयांनी असाच निर्णय घेत सोयाबीन, कपाशीचे पीक गुरांच्या स्वाधीन केले होते. यंदाही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी शेतामध्ये गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सोमवारी सेलू तालुक्यात घडलेला हा प्रकार काही दिवसांत अन्य तालुक्यांत दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. यात शेतकºयांचे मात्र प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकºयांची खिल्ली उडविणारा प्रकारपावसामुळे सोयाबीन भिजले. यामुळे ते नाफेडमार्फत खरेदी केले जात नाही. बाजार समितीमध्ये व्यापारी सोयाबीनला अत्यल्प भाव देत आहेत. रविवारी तर केवळ २०० रुपये क्ंिवटलचा दर सांगण्यात आले. हा प्रकार शेतकºयांची खिल्ली उडविणारा ठरत आहे. इतका कमी दर मिळत असताना शासकीय यंत्रणा कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसते. अशीच स्थिती राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, हा प्रश्नच आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, अशा प्रतिक्रीया शेतकरी शालिग्राम चाफले यांनी व्यक्त केली.अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त नाहीसेलूच्या बाजार समितीमध्ये अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. खासगी व्यापाºयांकडूनच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. चांगल्या शेतमालालाही नगण्य भाव दिले जात आहेत. कमकुवत असलेल्या शेतमालाकडे येथे कुणीही पाहत नाही. शिवाय शासकीय खरेदीदारही हा कमकुवत माल घेत नाहीत, हे विशेष! या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी शेतातील उभ्या पिकांत गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. वर्धा तालुक्यातही अनेक शेतकºयांनी सोयाबीनची मळणीच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतकºयांकडूनही शेतमाल गुरांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकºयांचे श्रम मात्र व्यर्थ जात आहेत.