शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:46 IST

बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले.

ठळक मुद्देभाव मिळत नसल्याने टाळला मळणीचा खर्च : शेतकºयांच्या आर्थिक अडचणींत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले. सवंगणीच्या कामावर झालेला खर्च निरर्थक गेला. आता मळणीवर खर्च करायचा नाही, असे भूमिका घेत शेतकºयाने सोयाबीन गुरांना चारले.सेलूच्या उपबाजार समितीमध्ये काळसर पडलेल्या सोयाबीनला २०० रुपये क्विंटलच्या भावात मागणी करण्यात आली होती. या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता सेलू तालुक्यातील घोराड या गावातील शेतकरी बंडू शंकरराव तडस यांनी सोयाबीनचे पीक गुरांच्या स्वाधीन केले आहे. सोयाबीनची सवंगणी करून त्यांनी पीक शेतातच ढीग लावून ठेवले होते. सर्व ढीग उचलून एकत्र करणे आणि मळणी यंत्रातून सोयाबीन काढणे, ही प्रक्रिया शिल्लक होती. बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांकडे लक्ष ठेवणाºया शेतकºयाने सोयाबीनचा रविवारचा भाव पाहिला व पीक गुरांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे पीक खराब झाले होते. शेंगांतील दाणे काळे पडले असल्याने बाजारपेठेत त्या सोयाबीनची कवडीमोल भावात मागणी होईल. ही मागणी आपल्याला व्यथित करणारी ठरेल. यापेक्षा आपल्या गुरांच्या पोटाची खळगी या पिकाने का भरू नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.मागील वर्षीही काही शेतकºयांनी असाच निर्णय घेत सोयाबीन, कपाशीचे पीक गुरांच्या स्वाधीन केले होते. यंदाही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी शेतामध्ये गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सोमवारी सेलू तालुक्यात घडलेला हा प्रकार काही दिवसांत अन्य तालुक्यांत दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. यात शेतकºयांचे मात्र प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकºयांची खिल्ली उडविणारा प्रकारपावसामुळे सोयाबीन भिजले. यामुळे ते नाफेडमार्फत खरेदी केले जात नाही. बाजार समितीमध्ये व्यापारी सोयाबीनला अत्यल्प भाव देत आहेत. रविवारी तर केवळ २०० रुपये क्ंिवटलचा दर सांगण्यात आले. हा प्रकार शेतकºयांची खिल्ली उडविणारा ठरत आहे. इतका कमी दर मिळत असताना शासकीय यंत्रणा कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसते. अशीच स्थिती राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, हा प्रश्नच आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, अशा प्रतिक्रीया शेतकरी शालिग्राम चाफले यांनी व्यक्त केली.अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त नाहीसेलूच्या बाजार समितीमध्ये अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. खासगी व्यापाºयांकडूनच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. चांगल्या शेतमालालाही नगण्य भाव दिले जात आहेत. कमकुवत असलेल्या शेतमालाकडे येथे कुणीही पाहत नाही. शिवाय शासकीय खरेदीदारही हा कमकुवत माल घेत नाहीत, हे विशेष! या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी शेतातील उभ्या पिकांत गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. वर्धा तालुक्यातही अनेक शेतकºयांनी सोयाबीनची मळणीच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतकºयांकडूनही शेतमाल गुरांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकºयांचे श्रम मात्र व्यर्थ जात आहेत.