शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:46 IST

बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले.

ठळक मुद्देभाव मिळत नसल्याने टाळला मळणीचा खर्च : शेतकºयांच्या आर्थिक अडचणींत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले. सवंगणीच्या कामावर झालेला खर्च निरर्थक गेला. आता मळणीवर खर्च करायचा नाही, असे भूमिका घेत शेतकºयाने सोयाबीन गुरांना चारले.सेलूच्या उपबाजार समितीमध्ये काळसर पडलेल्या सोयाबीनला २०० रुपये क्विंटलच्या भावात मागणी करण्यात आली होती. या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आता सेलू तालुक्यातील घोराड या गावातील शेतकरी बंडू शंकरराव तडस यांनी सोयाबीनचे पीक गुरांच्या स्वाधीन केले आहे. सोयाबीनची सवंगणी करून त्यांनी पीक शेतातच ढीग लावून ठेवले होते. सर्व ढीग उचलून एकत्र करणे आणि मळणी यंत्रातून सोयाबीन काढणे, ही प्रक्रिया शिल्लक होती. बाजारपेठेतील शेतमालाच्या दरांकडे लक्ष ठेवणाºया शेतकºयाने सोयाबीनचा रविवारचा भाव पाहिला व पीक गुरांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे पीक खराब झाले होते. शेंगांतील दाणे काळे पडले असल्याने बाजारपेठेत त्या सोयाबीनची कवडीमोल भावात मागणी होईल. ही मागणी आपल्याला व्यथित करणारी ठरेल. यापेक्षा आपल्या गुरांच्या पोटाची खळगी या पिकाने का भरू नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.मागील वर्षीही काही शेतकºयांनी असाच निर्णय घेत सोयाबीन, कपाशीचे पीक गुरांच्या स्वाधीन केले होते. यंदाही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी शेतामध्ये गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सोमवारी सेलू तालुक्यात घडलेला हा प्रकार काही दिवसांत अन्य तालुक्यांत दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये. यात शेतकºयांचे मात्र प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकºयांची खिल्ली उडविणारा प्रकारपावसामुळे सोयाबीन भिजले. यामुळे ते नाफेडमार्फत खरेदी केले जात नाही. बाजार समितीमध्ये व्यापारी सोयाबीनला अत्यल्प भाव देत आहेत. रविवारी तर केवळ २०० रुपये क्ंिवटलचा दर सांगण्यात आले. हा प्रकार शेतकºयांची खिल्ली उडविणारा ठरत आहे. इतका कमी दर मिळत असताना शासकीय यंत्रणा कुठलीही हालचाल करीत नसल्याचे दिसते. अशीच स्थिती राहिली तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही काय, हा प्रश्नच आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा, अशा प्रतिक्रीया शेतकरी शालिग्राम चाफले यांनी व्यक्त केली.अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त नाहीसेलूच्या बाजार समितीमध्ये अद्यापही शासकीय खरेदीचा मुहूर्त सापडलेला नाही. खासगी व्यापाºयांकडूनच सोयाबीनची खरेदी केली जात आहे. चांगल्या शेतमालालाही नगण्य भाव दिले जात आहेत. कमकुवत असलेल्या शेतमालाकडे येथे कुणीही पाहत नाही. शिवाय शासकीय खरेदीदारही हा कमकुवत माल घेत नाहीत, हे विशेष! या प्रकारामुळे शेतकºयांमध्ये नैराश्य आल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी शेतातील उभ्या पिकांत गुरे सोडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. वर्धा तालुक्यातही अनेक शेतकºयांनी सोयाबीनची मळणीच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या शेतकºयांकडूनही शेतमाल गुरांच्या स्वाधीन केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकºयांचे श्रम मात्र व्यर्थ जात आहेत.