शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जनावरे पडताहेत आजारी, अन् अधिकारी आपापल्या घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 21:27 IST

आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये लम्पी स्किन रोगाने जनावरांवर अटॅक केला असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हळूहळू हा रोग पाय पसरायला लागला असून, जिल्ह्यामध्ये तब्बल २६६ जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले होते; परंतु तरीही या विभागातील अधिकारीच मुख्यालयी दांडी मारत असल्याने इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यामध्ये लम्पीला अटकाव करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात साथ सुरू होताच, आपल्या जिल्ह्यामध्ये गोठ्यातील फवारणीला सुरुवात केल्याने या रोगाला रोखण्यात यश आले होते; परंतु आर्वी आणि आष्टी तालुक्यामध्ये जनावरांना या रोगाची बाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. बाधित जनावरे आढळून येताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बाधित गावांचा दौरा करून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश काढले होते. त्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आपलं सोडून दुसऱ्या जिल्ह्यात सेवा- जिल्ह्यामध्ये आधीच पशुसंवर्धन विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कसेबसे तत्कालीन सीईओ डॉ. ओम्बासे यांच्या पाठपुराव्याने प्रत्येक तालुक्यात कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. पण, या आपत्तीकाळात हे मनुष्यबळ अपुरे असल्याने आपल्या जिल्ह्यातील जनावरांचा मृत्युदर थांबविण्याची गरज असताना पशुसंवर्धन विभागाने एक-दोन नाही तर चार अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी पाठविले आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील स्थिती कशी सांभाळावी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग