शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जनावरे पडताहेत आजारी, अन् अधिकारी आपापल्या घरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2022 21:27 IST

आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये लम्पी स्किन रोगाने जनावरांवर अटॅक केला असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हळूहळू हा रोग पाय पसरायला लागला असून, जिल्ह्यामध्ये तब्बल २६६ जनावरे बाधित झाली आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे निर्देश दिले होते; परंतु तरीही या विभागातील अधिकारीच मुख्यालयी दांडी मारत असल्याने इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यामध्ये लम्पीला अटकाव करण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात साथ सुरू होताच, आपल्या जिल्ह्यामध्ये गोठ्यातील फवारणीला सुरुवात केल्याने या रोगाला रोखण्यात यश आले होते; परंतु आर्वी आणि आष्टी तालुक्यामध्ये जनावरांना या रोगाची बाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. बाधित जनावरे आढळून येताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बाधित गावांचा दौरा करून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याकरिता जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश काढले होते. त्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून उपाययोजना राबविणे आवश्यक असताना कागदोपत्री घोडे नाचवून उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सध्या काहींनी चालविला आहे. परिणामी इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ताण पडत असून, जिल्ह्यात लम्पीचे प्रमाण आणि जनावरे मृत पावण्याचे प्रमाणही वाढत आहे. म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी न राहता इतर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आपलं सोडून दुसऱ्या जिल्ह्यात सेवा- जिल्ह्यामध्ये आधीच पशुसंवर्धन विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. कसेबसे तत्कालीन सीईओ डॉ. ओम्बासे यांच्या पाठपुराव्याने प्रत्येक तालुक्यात कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले. पण, या आपत्तीकाळात हे मनुष्यबळ अपुरे असल्याने आपल्या जिल्ह्यातील जनावरांचा मृत्युदर थांबविण्याची गरज असताना पशुसंवर्धन विभागाने एक-दोन नाही तर चार अधिकारी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी पाठविले आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील स्थिती कशी सांभाळावी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग