शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

संतप्त नागरिक जिल्हाकचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 22:41 IST

शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देवाघहल्ला प्रकरण : घटनेच्या रात्री पोलीस आणि नागरिकांत वाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा / आकोली : शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्याकडून वाघाचा बंदोबस्त करण्यासह मृतकाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तत्पूर्वी रविवारी रात्री परिसरातील संतप्त नागरिक आणि पोलिसांत चांगलाच वाद झाला.आज आमगाव व परिसरातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत या विषयावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान मृतकाच्या कुटुंबियाला चार लाख रुपये आता व चार लाख रुपये आठ दिवसांनी देवू, शिवाय मृतकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना दिले. या आश्वासनावर गावकरी गावाकडे परतले. मागण्या दुर्लक्षित झाल्या असत्या तर गावकºयांकडून चेतनचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याची तयारी गावकºयांची होती. जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर चेतन याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी व वन्यजीव विभागाने पाठ फिरविली. केवळ प्रादेशिक विभागाच्या अधिकाºयांची व गावकºयांची येथे उपस्थिती होती.पोलिसांचा उद्दामपणावाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकºयाचे कुटुंब घटनास्थळी गेले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांच्याकडून घटनास्थळाकडे धाव घेण्यात आली. घटनेमुळे नागरिक संतप्त असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे व ठाणेदार निलेश ब्राम्हणे यांनी त्यांची समजूत घातली. पण गावकरी मृतदेह न देण्याच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी रात्री १२ वाजता राज्य राखीव पोलीस दलाने बळाचा वापर करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. यावेळी झालेल्या वादात मृतकाचे वडील दादाराव व भावाला पोलिसांकडून मारहाण झाली. सकाळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिल्याने कुटुंबिय आज सकाळी रुग्णालयात मृतदेह स्विकारण्यासाठी गेले.वनविभागाच्या पत्राला वन्यजीव विभागाचा ठेंगाआमगाव (जंगली), बोगावा (गोंडी), सुसूंद हा भाग न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहे. यामुळे या भागात वन्यप्राण्यांची ये-जा असते. यात वाघांचाही समावेश आहे. याचा त्रास गावकºयांना झाल्यानंतर वनविभागाने वन्यजीव विभागाला वाघ सांभाळण्याचे एक पत्र दिले होते. त्या पत्राला वन्यजीव विभागाकडून ठेंगा दाखविल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.