शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:52 IST

राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीसमोर ठिय्या : केंद्र बंद करण्याचा निर्णय मागे घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने ज्या अंगणवाडी केंद्रात कमीत कमी २५ मुले नाहीत अशी अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेत तसा आदेश निर्गमित केला आहे. सदर आदेश अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा ठपका ठेवत तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाकचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शालेय पोषण आहार देणाऱ्या महिलांना प्रतिदिवस ३५० रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले होते. शिवाय गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्रतिदिवस मानधन देण्याचेही आश्वासन दिले होते. परंतु, या आश्वासनाची पूर्तता अद्यापही त्यांनी केली नाही. सदर आश्वासनाची पूर्तता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसह विविध मागण्याही निवेदनातून करण्यात आला आहेत. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात २५ पेक्षा कमी मुले नाहीत अशा अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिवसभर असलेल्या ढगाळी वातावरणाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्धा जिल्हा आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हा संघटक असलम पठान, विजया पावडे, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा