शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

कुटुंबातील संवाद संपुष्टात येत असल्याने आनंद नष्ट होतोय

By admin | Updated: September 26, 2016 02:21 IST

कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे.

प्रकाश एदलाबादकर : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालादेवळी : कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे. सासू सुनेशी व वडील मुलाशी धड बोलत नसल्याचे विदारक चित्र आहे. लहान वाटणारा माणूस मोठा व मोठा दिसणारा व्यक्ती लहान व शुद्र असल्याची अनुभूती येत आहे. यामुळे स्वत:ची ओळख पटविण्यासोबतच मनातील अहंकार बाजूला सारण्यातच खरा आनंद आहे, असे मत विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रकाश एदलाबादकर यांनी व्यक्त केले.देव कुणीही बघितला नाही. याचा अर्थ देव अस्तित्वात नाही, असा होत नाही, हे सांगताना एदलाबादकर म्हणाले की, असे असले तरी फुले, अगरबत्ती, दुर्वा या सर्व देवासमोरील उपकरणांना महत्त्व देण्यापेक्षा समाजातील माणसे जपण्यासाठी वेळ घालवा. संकटातून मार्ग काढण्यात परमार्थ शोधा. आयुष्यात आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला अर्पण करतो वा एखाद्यासाठी धडपडतो, म्हणजेच दुसऱ्यासाठी जगण्याचा तो खरा आनंद असतो. ऋषी, मूनींनी माणसाची सेवा हिच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले, असेही एदलाबादकर यांनी विषयाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. अग्रवाल धर्मशाळेत साबाजी स्पोर्टस असोसिएशनद्वारे श्यामसुंदर अग्रवाल स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली. यावेळी ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अध्यक्ष शोभा तडस तर अतिथी म्हणून यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व श्यामसुंदर अग्रवाल यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणप्राप्त विद्यार्र्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात दहावीची वैष्णवी सुरेश गावंडे, बारावीच्या प्रतिभा विनोद जगताप व पौर्णिमा राजू हिंगे यांचा समावेश होता. तडस यांनी श्यामसुंदर अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून साबाजी स्पोर्टस असो. चे अध्यक्ष मोहनलाल अग्रवाल यांनी ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय माजी प्राचार्य दयानंद कात्रे यांनी करून दिला. संचालन नगरसेवक राहुल चोपडा यांनी केले तर आभार नरेश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला ईमरान राही, दाऊदास टावरी, शरद नाईक, मधू अग्रवाल, प्रकाश कांकरीया, सुरजमल जैन, शरद आदमने, महेश अग्रवाल, श्यामसुंदर बासू, विजय मांडवकर, ग्रामसेवक होले, मनोज येवतकर, अच्युत इंगोले व नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)