शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

कुटुंबातील संवाद संपुष्टात येत असल्याने आनंद नष्ट होतोय

By admin | Updated: September 26, 2016 02:21 IST

कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे.

प्रकाश एदलाबादकर : श्यामसुंदर अग्रवाल स्मृती व्याख्यानमालादेवळी : कुटुंबातील संवाद दिवसेंदिवस संपुष्टात येत असल्याने आपल्यातील आनंद नष्ट होत आहे. प्रत्येकाची जीवनशैली बदलून गेल्याने हा सर्व प्रकार होत आहे. सासू सुनेशी व वडील मुलाशी धड बोलत नसल्याचे विदारक चित्र आहे. लहान वाटणारा माणूस मोठा व मोठा दिसणारा व्यक्ती लहान व शुद्र असल्याची अनुभूती येत आहे. यामुळे स्वत:ची ओळख पटविण्यासोबतच मनातील अहंकार बाजूला सारण्यातच खरा आनंद आहे, असे मत विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रकाश एदलाबादकर यांनी व्यक्त केले.देव कुणीही बघितला नाही. याचा अर्थ देव अस्तित्वात नाही, असा होत नाही, हे सांगताना एदलाबादकर म्हणाले की, असे असले तरी फुले, अगरबत्ती, दुर्वा या सर्व देवासमोरील उपकरणांना महत्त्व देण्यापेक्षा समाजातील माणसे जपण्यासाठी वेळ घालवा. संकटातून मार्ग काढण्यात परमार्थ शोधा. आयुष्यात आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला अर्पण करतो वा एखाद्यासाठी धडपडतो, म्हणजेच दुसऱ्यासाठी जगण्याचा तो खरा आनंद असतो. ऋषी, मूनींनी माणसाची सेवा हिच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले, असेही एदलाबादकर यांनी विषयाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. अग्रवाल धर्मशाळेत साबाजी स्पोर्टस असोसिएशनद्वारे श्यामसुंदर अग्रवाल स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमाला पार पडली. यावेळी ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अध्यक्ष शोभा तडस तर अतिथी म्हणून यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व श्यामसुंदर अग्रवाल यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी गायत्रीदेवी मोहनलाल अग्रवाल यांच्या स्मृत्यर्थ दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणप्राप्त विद्यार्र्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात दहावीची वैष्णवी सुरेश गावंडे, बारावीच्या प्रतिभा विनोद जगताप व पौर्णिमा राजू हिंगे यांचा समावेश होता. तडस यांनी श्यामसुंदर अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून साबाजी स्पोर्टस असो. चे अध्यक्ष मोहनलाल अग्रवाल यांनी ३३ वर्षांपासून सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय माजी प्राचार्य दयानंद कात्रे यांनी करून दिला. संचालन नगरसेवक राहुल चोपडा यांनी केले तर आभार नरेश अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाला ईमरान राही, दाऊदास टावरी, शरद नाईक, मधू अग्रवाल, प्रकाश कांकरीया, सुरजमल जैन, शरद आदमने, महेश अग्रवाल, श्यामसुंदर बासू, विजय मांडवकर, ग्रामसेवक होले, मनोज येवतकर, अच्युत इंगोले व नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)