शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: November 2, 2016 00:42 IST

देशात सर्वात मोठे दळणवळणाचे जाळे असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांत असुरक्षिततेची भावना आहे.

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : बनावट तृतीयपंथी, अवैध वेंडर्सचा हैदोसवर्धा : देशात सर्वात मोठे दळणवळणाचे जाळे असलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांत असुरक्षिततेची भावना आहे. धावत्या रेल्वे गाडीत अवैध वेंडर्स, खाद्यपदार्थ विक्रेते, तृतीयपंथी आणि भिक्षेकरूंचा वावर वाढला आहे. पैसे न दिल्यास रेल्वे गाड्यांमध्ये फिरणारे बनावट तृतीयपंथी प्रसंगी प्रवाशांना मारहाण करतात. रेल्वे गाड्यांतील ही बाब नित्याची असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली आहे; पण अलिकडे नागपूर ते अकोला दरम्यान रेल्वे गाड्यांत प्रवास ‘नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे असो वा पॅसेंजर गाड्या सर्वांमध्ये प्रवासी असुरक्षित आहे. रेल्वे गाड्यांत तृतीयपंथी वा अवैध वेंडर्स रेल्वे सुरक्षाबल, पोलिसांच्या मान्यतेशिवाय चालू शकत नाही. यासाठी तृतीयपंथी वा अवैध वेंडर्सकडून रेल्वे पोलिसांचे हप्ते ठरल्याचा आरोप वारंवार होतो. बडनेरा, अमरावती, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, वर्धा, पुलगाव, चांदूर (रेल्वे), धामणगाव आदी रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ कंत्राटदारांना अतिरिक्त वेंडर्सना व्यवसाय करण्याकरिता महिन्याकाठी रेल्वे सुरक्षाबल व रेल्वे पोलिसांना मोठी रक्कम पुरवावी लागते. खिसेकापू तासाप्रमाणे रेल्वे पोलिसांना पैसे मोजत असल्याची माहिती आहे. बडनेरा स्थानकावर खाद्यपदार्थ कंत्राटदारांकडून मान्यतेपेक्षा अधिक वेंडर्सना रेल्वे सुरक्षाबलाकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. फलाटावर गाडी थांबली की, अवैध वेंडर्सचा बाजार दिसतो; पण धावत्या गाड्यांमध्ये बनावट तृतीयपंथियांकडून होणारी लूट कधी थांबणार, हा प्रश्नच आहे. तृतीयपंथियांच्या टोळीने रेल्वेत प्रवेश केला की, ते मर्जीनुसार पैसे उकळतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये तृतीयपंथी टोळक्याने प्रवेश करतात. यासाठी रेल्वे स्थानकाच्या सीमा ठरल्या आहे. एका सीमेतच तृतीयपंथी वा अवैध वेंडर्सना व्यवसायाची रेल्वे सुरक्षा बलाकडून परवानगी दिली असली तरी चित्र वेगळेच आहे. हल्ली वर्धा, सेवाग्राम रेल्वे स्थानकावर हा प्रकार दिसत नसला तरी पुलगाव ते बडनेरा व सेवाग्राम ते समोर नागपूरपर्यंत तृतीयपंथी व अवैध वेंडर्सचा ससेमीरा असतोच. रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या या प्रकारांवर आळा घालण्याकरिता रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी तसेच रेल्वे प्रशासनाने योग्य कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)