शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाची रक्कम कर्जखात्यात केली वळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:31 IST

तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देबँक आॅफ बडोदातील प्रकार : वायफडचे शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. व याबाबतची अडचण सांगितली.या आंदोलनाचे नेतृत्व भास्कर इथापे यांनी केले. बँक आॅफ बडोदा शाखा वायफड येथील शेतकरी खातेदार यांना विविध योजने अंतर्गत अनुदान प्राप्त झाले. यामध्ये गुलाबी बोंडअळी, सोयाबीनचे अळीने झालेले नुकसान व श्रावणबाळ योजना यांच्या अनुदानाचा समावेश होता. सदर अनुदानाची रक्कम बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कर्ज खात्यात वळती केली. कर्जखात्यात अशा रक्कमा वळत्या करता येत नाही. तरीही हा प्रकार घडला. शासनाने या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे.हे सर्व खातेदार कर्जमाफीचे लाभार्थी आहे. त्यामुळे यांचे अनुदान खात्यात वळते करणे म्हणजे यांना मानसिक त्रास देण्याचाच प्रकार असल्याचा आरोप रमेश भगत, माणिक पुरी, राजकन्या भोसले, ज्योती जोटे, वसंत मुळे, पृथ्वीराज शिंदे, विक्रम खडसे, वासुदेव पडोळे, रामभाऊ झोटींग, नरेश मुळे, विश्वनाथ वांदीले, संतोष फुलकरी, रामदास सोळंके, पंकज कुकरे, प्रमोद ढोक, गजानन बकाणे, कमलाबाई तलवारे, विलास पुरी, मोहोड, गजानन डबाले, लक्ष्मण मोहोड, वामन जोले, राजू मुळे, मारोती वाके, किसना वांदीले, अशोक मसराम, कवडू थोटे, झगलेराव पवार, बरक पवार, बळवंत चौधरी, भिमराव लोहकरे, विजय वानखेडे, बाबा शेख आदींसह शेतककऱ्यांनी केला आहे.आजंतीतही असाच प्रकारहिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील शेतकरी वाल्मिक काशीनाथ भालशंकर यांना बोंडअळीचे अनुदान शासनाकडून मिळाले. बँक आॅफ बडोदाच्या शाखेत हे अनुदान जमा झाले. त्यांना १३,६०० रूपयाचे अनुदान मिळाले. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम दाखविण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी हिंगणघाट येथे जावून बँकेतचौकशी केली तर त्यांना कर्जाच्या पुनर्गठनामध्ये ही रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. व बँकेने ही रक्कम परत देण्यास नकार दिला आहे. भालशंकर यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेच्या धोरणाविरूद्ध रोष आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक