शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वंचितांच्या उत्थानासाठी गांधी - आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 19:24 IST

इतिहास चांगल्या वा वाईट कामाची नोंद ठेवत असतो. पण इतिहासात चुकीच्या बाबींचा अंतर्भाव झाल्याचे दिसते. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते..

सेवाग्राम (वर्धा) :  इतिहास चांगल्या वा वाईट कामाची नोंद ठेवत असतो. पण इतिहासात चुकीच्या बाबींचा अंतर्भाव झाल्याचे दिसते. गांधीजी आणि बाबासाहेबांच्या कार्याचा विचार केल्यास दोघांचेही मिशन एकच होते. त्या काळात दोघांत वाद होता, पण संवाद कधीच थांबला नाही. त्याकाळी शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी कार्य केले. म्हणून महात्मा गांधी आणि आंबेडकरांचे योगदान महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर व्यक्त केले. 

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७० व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच दक्षिणायन चळवळीच्या समास २०१८ या अभियानात सेवाग्राम ते दीक्षाभूमी अभियानाचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी तर प्रमुख वक्ता म्हणून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, पद्मश्री डॉ. गणेश देवी, आ. आशिष देशमुख, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, महाराष्ट्र भूदान मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ विरूळकर, मा.म. गडकरी, उषा गांधी व सरपंच रोशना जामलेकर उपस्थित होते. मान्यवरांचे खादी शाल सुतमाळ व ग्रंथ देवून स्वागत करण्यात आले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, परिस्थिती का बदलली. विरोध करायला त्याकाळी हिंदु महासभा, रा.सं. सेवक संघ होतेच. आज पण यासह विविध गट निर्माण झालेले आहे. आज दलितांसह बहुजन वर्गात शक्तीसह चेतना निर्माणाचे काम करावे लागेल. समाजातील कथीत ठेकेदारांच्या विरूद्ध वंचितांना उतरवावे लागेल. दोघांनी वंचितांना व्यवस्थेचा भाग बनविले. वर्णव्यवस्था नाकारल्याने दोघांचेही विचार व कार्य एकच असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

सज्जनाचे आंदोलन नाही म्हणून दुर्जनाची शक्ती वाढल्याचे प्रतिपादन न्या. धर्माधिकारी यांनी केले. गांधी आंबेडकरांचे आंदोलन अहिंसेवर आधारित होते. पुणे कराराच्या अनुषंगाने पुण्यात दोघांचा पुतळा उभारला पाहिजे. शाळा मंदिर वैभवशाली झाली आहे. समाज परिवर्तनाचे प्रवासी बनून राष्ट्र निर्माणाचे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. गणेश देवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले तर संचालन आणि उपस्थितांचे आभार मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. प्रारंभी वैष्णव जन तो, हे भजन आनंद निकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. हे नम्रता के सागर, या प्रार्थनेने ेसमारोप झाला. आश्रमाच्या इतिहासाची माहिती मार्गदर्शक संगिता चव्हाण यांनी दिली. स्वागत कामगार जयश्री पाटील व पांडुरंग थुल यांनी केले. बापूंना सर्वांनी उभे राहून आदरांजली वाहिली.

धर्माचे राजकारण धोकादायक - राजमोहन गांधी

च्याप्रसंगी राजमोहन गांधी म्हणाले, धर्माचे राजकारण धोकादायक बनले आहे. १९४८ ला महात्मा गांधी तर १९५६ ला बाबासाहेब आम्हाला सोडून गेले.  गांधीजींच्या हत्येपासून हत्यासत्र सुरू असल्याचे दिसते. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण खºया अर्थाने विचारांचे स्वातंत्र्य कुठे आहे. गांधींचा आदर आहे. पण ईश्वर अल्ला असे म्हणणे ते आता कुठे दिसत नाही. दोघात विरोध, वाद होता पण संवाद थांबला नाही. ते तत्वावर चालणारे होते. देश संविधानावर चालवा, असेही ते म्हणाले.