शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी

By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST

खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात

मुख्यमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणीहिंगणघाट : खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला़ यासाठी शेतकऱ्याला कृषी केंद्र धारकांसह सावकारांचे कर्ज करावे लागले़ शेतकरी आर्थिक संकटात असल्याने शासनाने एकरी २५ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले़पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनची पेरणी दीड महिना उशिरा झाली़ मध्यंतरी पावसाच्या गैरहजेरीने सोयाबीनचे संपूर्ण पीक नेस्तनाबूत झाले़ यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० किलो, १०० किलो, १५० किलो असा उतारा मिळाला़ सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही भरून निघू शकला नाही़ यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे़ काही शेतकऱ्यांनी शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगण्याचे कामच ठेवले नाही. पिकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारातच गेली.कापसाच्या बियाण्यांची दुबार-तिबार पेरणी करावी लागली़ उशिरा लागवड केल्याने खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पूरेसे पाणी मिळाले नाही. आॅगस्ट व सप्टेंबरच्या १५ तारखेपर्यंत पाऊस आला़ त्यानंतर २ महिन्यांपासून आजपर्यंत पाऊसच आला नाही. यामुळे कपाशीच्या पिकाची जमीन फाकली असून किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पठारी रानावरील कपाशीचे पीक सुकलेल्या अवस्थेत आहे. तुरीचे पीकही किडीच्या प्रादुर्भावाने खराब झाले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे़ शासनाने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा़ प्रभावित झालेले तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून मदत करावी, अशी मागणी तिमांडे यांनी निवेदनातून केली़(तालुका प्रतिनिधी)