शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी

By admin | Updated: November 24, 2014 23:03 IST

खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात

मुख्यमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणीहिंगणघाट : खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात खर्च करावा लागला़ यासाठी शेतकऱ्याला कृषी केंद्र धारकांसह सावकारांचे कर्ज करावे लागले़ शेतकरी आर्थिक संकटात असल्याने शासनाने एकरी २५ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले़पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनची पेरणी दीड महिना उशिरा झाली़ मध्यंतरी पावसाच्या गैरहजेरीने सोयाबीनचे संपूर्ण पीक नेस्तनाबूत झाले़ यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० किलो, १०० किलो, १५० किलो असा उतारा मिळाला़ सोयाबीन पिकासाठी केलेला खर्चही भरून निघू शकला नाही़ यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे़ काही शेतकऱ्यांनी शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगण्याचे कामच ठेवले नाही. पिकांच्या या स्थितीमुळे शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारातच गेली.कापसाच्या बियाण्यांची दुबार-तिबार पेरणी करावी लागली़ उशिरा लागवड केल्याने खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पूरेसे पाणी मिळाले नाही. आॅगस्ट व सप्टेंबरच्या १५ तारखेपर्यंत पाऊस आला़ त्यानंतर २ महिन्यांपासून आजपर्यंत पाऊसच आला नाही. यामुळे कपाशीच्या पिकाची जमीन फाकली असून किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पठारी रानावरील कपाशीचे पीक सुकलेल्या अवस्थेत आहे. तुरीचे पीकही किडीच्या प्रादुर्भावाने खराब झाले आहे. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे़ शासनाने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा़ प्रभावित झालेले तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून मदत करावी, अशी मागणी तिमांडे यांनी निवेदनातून केली़(तालुका प्रतिनिधी)