शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:43 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार । कर्मचाऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी २४ मार्चला होऊ घातली आहे. याकरिता विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना कंट्रोल व बॅलेट युनिटचे जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात वितरण करण्यात आले. याकरिता सकाळी ८.३० वाजताच शिक्षक व इतर कर्मचाºयांना बोलावण्यात आले होते. मात्र, संकुल परिसरात सुविधांचा प्रचंड अभाव दिसून आला.मशीन घेण्याकरिता आलेल्या कर्मचाºयांना बसण्याकरिता पुरेशा मॅटिन नव्हत्या. सभा मंडपही अतिशय तोकडा होता. त्यामुळे कर्मचाºयांना उन्हातच जागा मिळेल तेथे जमिनीवरच बसावे लागले. पर्याय म्हणून अनेकांनी या परिसरातील वृक्षांचा आधार घेतला.सध्या उन्हाळयाचे दिवस आहेत. तापमान दिवसागणिक वाढत असतानाच पिण्याच्या पाण्याची याशिवाय पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.परिणामी, पाण्याविनाच सकाळपासून आलेल्या महिला, पुरुष कर्मचाºयांना ताटकळावे लागले. अनेक कर्मचारी पाण्याची बाटली खरेदी करण्याकरिता परिसरात फिरताना दिसून येत होते. निवडणूक विभागाचा ‘पुअर शो’ आणि झालेली गैरसोय यामुळे शिक्षक, कर्मचाºयांनी प्रचंड संताप व्यक्त केला.वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाकईव्हीएम मशिन वितरणाच्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे कठडे लावण्यात आले होते. याच ठिकाणी दुतर्फा दुचाकी वाहने उभी करण्यात आली होती. येथून वाट काढताना कर्मचाºयांची चांगलीच दमछाक झाली.पिण्याच्या पाण्यासाठी कर्मचाºयांची भटकंतीजिल्हा क्रीडा संकुलात इव्हीएम मशिन वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तत्पूर्वी या जागेची प्रशासनाकडून साधी पाहणीही करण्यात आली नाही. मंडप अर्धवटच टाकलेला होता. यातही महिला आणि पुरुष कर्मचाºयांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांनी जागा मिळेल तेथे आश्रय घेतल्याचे दिसून आले. गैरसोयीबद्दल कर्मचाºयांची नाराजी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीमुळे इतर ठिकाणे हाऊसफुल्ल असल्याने कर्मचाºयांची संकुलात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागला.अजय धर्माधिकारीनिवडणूक विभाग, वर्धा

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत