शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाच्या अभावातच मतदान साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:43 IST

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक विभागाचा ढिसाळ कारभार । कर्मचाऱ्यांची हेळसांड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात बॅलेट व कंट्रोल युनिटचे वितरण करण्यात आले. मात्र, जिल्हा निवडणूक विभागाने नियोजनाच्या अभावातच ही प्रक्रिया पार पाडल्याने कर्मचाऱ्यांमध्ये रोषाचे वातावरण होते.जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतींची निवडणूक रविवारी २४ मार्चला होऊ घातली आहे. याकरिता विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाºयांना कंट्रोल व बॅलेट युनिटचे जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात वितरण करण्यात आले. याकरिता सकाळी ८.३० वाजताच शिक्षक व इतर कर्मचाºयांना बोलावण्यात आले होते. मात्र, संकुल परिसरात सुविधांचा प्रचंड अभाव दिसून आला.मशीन घेण्याकरिता आलेल्या कर्मचाºयांना बसण्याकरिता पुरेशा मॅटिन नव्हत्या. सभा मंडपही अतिशय तोकडा होता. त्यामुळे कर्मचाºयांना उन्हातच जागा मिळेल तेथे जमिनीवरच बसावे लागले. पर्याय म्हणून अनेकांनी या परिसरातील वृक्षांचा आधार घेतला.सध्या उन्हाळयाचे दिवस आहेत. तापमान दिवसागणिक वाढत असतानाच पिण्याच्या पाण्याची याशिवाय पंख्यांचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.परिणामी, पाण्याविनाच सकाळपासून आलेल्या महिला, पुरुष कर्मचाºयांना ताटकळावे लागले. अनेक कर्मचारी पाण्याची बाटली खरेदी करण्याकरिता परिसरात फिरताना दिसून येत होते. निवडणूक विभागाचा ‘पुअर शो’ आणि झालेली गैरसोय यामुळे शिक्षक, कर्मचाºयांनी प्रचंड संताप व्यक्त केला.वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाकईव्हीएम मशिन वितरणाच्या ठिकाणी पोलीस विभागातर्फे कठडे लावण्यात आले होते. याच ठिकाणी दुतर्फा दुचाकी वाहने उभी करण्यात आली होती. येथून वाट काढताना कर्मचाºयांची चांगलीच दमछाक झाली.पिण्याच्या पाण्यासाठी कर्मचाºयांची भटकंतीजिल्हा क्रीडा संकुलात इव्हीएम मशिन वितरणाची व्यवस्था करण्यात आली. तत्पूर्वी या जागेची प्रशासनाकडून साधी पाहणीही करण्यात आली नाही. मंडप अर्धवटच टाकलेला होता. यातही महिला आणि पुरुष कर्मचाºयांची प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांनी जागा मिळेल तेथे आश्रय घेतल्याचे दिसून आले. गैरसोयीबद्दल कर्मचाºयांची नाराजी व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीमुळे इतर ठिकाणे हाऊसफुल्ल असल्याने कर्मचाºयांची संकुलात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीचा सामना करावा लागला.अजय धर्माधिकारीनिवडणूक विभाग, वर्धा

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत