शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

३०० लोकांचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:36 IST

गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे.

ठळक मुद्देदुर्गंधीयुक्त पाण्याच्या विरोधात आष्टीकर एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी नगरपंचायत जलशुध्दीकरण केंद्रामधून दुर्गंधीयुक्त पिवळे दुषित पाणी पुरवठा करीत आहे. या विरोधात आष्टीकर संतप्त झाले आहे. गुरूवारी ३०० महिला, पुरुष मंडळींनी नगरपंचायतवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. प्रकरण चांगलेच तापले आहे. आंदोलक मोर्चेकरांनी शुध्द पाणी न दिल्यास लढा तीव्र करणार असल्याचे सांगितले.ममदापूर तलावामध्ये अनेक वर्षापासून गाळ उपसला नाही. तेथून जलशुध्दीकरण केंद्रावर येणारे पाणी सडके व दुर्गंधीयुक्त आहे. पावसाळा सुरू होण्याआधी नगरपंचायतीने काहीही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे दुषित सडके पाणी पिण्यात गेल्याने भयंकर परिस्थिती चिघळली आहे. साथीच्या आजाराची लागण होण्याची लक्षणे आढळून आली आहे. नगरपंचायत करवसूली करतात, मात्र स्वच्छ पाणी पुरवित नाही. यासाठी आष्टीकरांनी बरीच वाट पाहिली, तरीसुध्दा काहीच हालचाल झाली नाही.याप्रकरणी २५ जुलैला लोकमतमध्ये ‘२५ हजार लोकसंख्येच्या आरोग्याशी खेळ’ दुर्गंधीयुक्त पिवळ्या पाण्याचा पुरवठा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी महिला व पुरुष मंडळी यांनी दुपारी १ वाजता नगरपंचायतमध्ये मोर्चा आणला. मुख्याधिकारी पंकज गोसावी यांना सर्व मोर्चेकरांनी घेराव घातला. एका कॅनमध्ये पिवळे पाणी आणले ते पाणी मुख्याधिकारी यांनी पिवून दाखवावे असे आवाहन केले. सत्ताधारी पदाधिकारीही हजर होते. त्यांनी यावर काहीही उत्तर दिले नाही. प्रकरणाची दखल घेऊन स्वच्छ पाणी देवू, असे मुख्याधिकारी सांगत होते. मात्र सद्यातरी काहीही पर्यायी उपाययोजना केल्या नाही.आरोग्य विभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणीनगरपंचायतमधील पाण्याचा प्रश्न सद्यातरी चांगलाच पेटला आहे. बुधवारी जलशुद्धीकरण केंद्राची आरोग्य विभागाने पाहणी केली. विरोधी पक्षाने भाजपा सदस्यही पाणी प्रश्नावर संतप्त झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करण्याच्या आश्वासनावर सध्या आंदोलक मोर्चेकरी आठवडाभर प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले. तात्काळ शुध्द पाणी न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा, इशारा मोर्चेकरांनी मुख्याधिकारी यांना दिला आहे.

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण