शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यवस्थापकाने आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून पीककर्जाकरिता नो-ड्यू आणण्याची सक्ती केली आहे.

ठळक मुद्देआदेशाला ठेंगा : एकाही शेतकऱ्याला पीककर्ज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : खरिपाची लगबग सुरु झाल्याने लॉकडाऊनच्या काळात पीककर्जाकरिता आवश्यक कागदपत्र मिळविताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे हंगामापूर्वी पीककर्ज मिळावे याकरिता शेतकऱ्यांना नो-ड्यूची सक्ती न करता मुद्रांकावर शपथपत्र लिहून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. असे असतानाही येथील अलाहाबाद बँकेने या आदेशाला केराची टोपली दाखवित, नो-ड्यू असल्याशिवाय पीककर्ज मिळणार नाही,असे फर्मान सोडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहेत.येथील अलाहाबाद बँकेत विजयगोपाल, तांभा (येंडे), सावंगी (येंडे), हिवरा-कावरे, मलातपूर, कोल्हापूर, रोहणी, चोंडी, हिरापूर, तळणी या गावातील शेतकऱ्यांचे व्यवहार आहे.आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यवस्थापकाने आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून पीककर्जाकरिता नो-ड्यू आणण्याची सक्ती केली आहे. व्यवस्थापकाच्या या मनमानी कारभारामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने कृषी केंद्र चालकही उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही.त्यामुळे आता पेरणी करायची कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बँकेने पीककर्ज देण्यास नकारघंटा सुरु ठेवली तर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकाराच्या दारात जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांचा पीककर्जाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहेत. लॉकडाऊनमुळे यावर्षी बँकाचे कामकाजही पुर्णवेळ होऊ शकले नाही. मागील वर्षीचे कर्ज भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असली तरी नविन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी आहे.शेतकरी राष्ट्रीयकृत दोन-तीन बँकेकडून कर्ज घेत आहे. त्यामुळे तीन ते चार राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना ना-हरकत प्रमाणपत्र आणावयास सांगितले जात आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीककर्ज देता येणार नाही.दीपक जैन, व्यवस्थापक, अलाहाबाद बँक, विजयगोपाल

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक