शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कानगावात दारूविक्रीने गाठला कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:28 IST

नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : समित्या नाममात्र, महिलांना सहन करावा लागतोय नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : नजीकच्या कानगाव येथे ठिकठिकाणी गावठी व देशी तसेच विदेशी दारूची विक्री होत आहे. त्यामुळे गावातील महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सदर अवैध दारूविक्रीच्या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील दारूविक्रीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणी आहे.कानगाव येथे परिसरातील मद्यशौकीन दारू ठोसण्यासाठी येतात. त्यामुळे दारूविक्रेत्यांच्या घरासमोर नेहमीच मद्यपींची गर्दी राहते. इतकेच नव्हे तर दारूच्या नशेत बेधुन्द झालेले मद्यपी बरेचदा शिविगाळ करीत असल्याने गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. गावातील दारूविक्रीचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. कानगाव हे गाव अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते. परंतु, या पोलीस कचेरीतील काही पोलीस कर्मचारी दारूविक्रेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंधच जोपासण्यात धन्यता मानत असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अनेक मद्यपी मद्यधुंद अवस्थेत वाहन पळवित असल्याने हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र अशा बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी अल्लीपूर पोलीस प्रयत्न करीत नाहीत. गावातील विविध समिती नावालाच शिल्लक राहिल्या असून पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष देत कानगावात दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे. गावात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अल्लीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये दारूबंदी महिला मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु, सदर मंडळाच्या महिलांना पोलिसांकडूनच पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवसायाला उधाण आल्याचे दिसून येते. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असताना कानगावात देशी, विदेशी व गावठी दारू सहज मिळत आहे.दारूविक्रेत्यांना सर्वांचेच अभयकानगावात पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अस्तित्वात आहे. परंतु, या संदर्भात कुणीही एक शब्द काढत नाही. तसेच दारूविक्रेत्यांवर कुठली कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे.दारू विक्रेत्यांना पोलिसांसह राजकीय पुढाऱ्यांचेही आशीर्वाद मिळत असल्याचे गावातीलच महिलांमध्ये चर्चा होत आहे. सायंकाळी कानगावातील दारूविक्रेत्यांच्या घरासमोर मद्यपींची गर्दी होते.नजीकच्या नेरी (मिरापूर) या गावात दारूबंदी असून या गावातील अनेक मद्यपी दारू रिचविण्यासाठी कानगावात येत असल्याचे दिसून येते. येथील दारूविक्रेत्यांवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेऊन प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी