शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

नवदाम्पत्यावर वधू कुटुंबीयांनी वर्धेतून टाकल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.

ठळक मुद्देदिल्लीत पार पडला लग्नसोहळा : मुलीने विचारल्यानंतर कुटुंबीयांनीही दिली लग्नास परवानगी

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जीवन पद्धतीत अनेक बदल होत आहेत. ऐरवी विवाह सोहळ्याला शेकडो निकटवर्तीय उपस्थित राहायचे. परंतु, ओढावलेल्या कोरोना संकटामुळे सध्या विवाह सोहळाही मोठ्या पद्धतीने करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्धा शहराशेजारील रोठा येथील मूळ रहिवासी असलेल्या एका मुलीचा विवाह दिल्लीत रविवार २४ मे रोजी पार पडला; पण लॉकडाऊनमुळे दिल्ली न गाठू शकणाऱ्या वधूच्या आई-वडिलांनी वर्धेतूनच ऑनलाईन पद्धतीने लग्नसोहळा बघून नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले.वर्धा शहराशेजारील रोठा येथील गोविंद गोपाळ हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांना अर्धांगवायूच्या आजारने ग्रासले आहे. तर त्यांची पत्नी मंजूषा या शेती करून कुटुंबाचा गाढा ओढतात. शेतीच्या जोरावर या गोपाळ दाम्पत्याने त्यांचे अपत्य अश्विनी, नकुल, तेजस्वीनी आणि चांदणी या चौघांना उच्च शिक्षित केले. त्यानंतर अश्विनी हिला दिल्ली येथे एका खासगी कंपनीत नोकरी लागली. मुलगी लग्नाची झाल्याने तिच्या कुटुंबीयांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. अशातच मुलीने तिचा जीवनसाथी शोधल्याचा निरोप तिने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यावर कुटुंबीयांनीही होकार दर्शविला. फेब्रुवारी महिन्यात साखरपुड्याचा सोहळा पार पडला. शिवाय मार्च महिन्यात लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्नाची २४ मार्च ही तारीख जवळ येत असतानाच देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे वधू-वराचे हात पिवळे कसे करावे असा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांना सतावू लागला. अश्विनीच्या कुटुंबाने आणि मनप्रितसिंहच्या कुटुंबांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर दिल्लीतच विवाह पार पाडण्याचे ठरले. आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.सर्वच आले होते सजूनवधूची आई मंजूषा, वडिल गोविंद, मुलगा नकुल तसेच बहिण तेजस्वीनी आणि चांदणी यांच्यासह आजोबा चिंतामणी शेंडे हे विवाह सोहळा बघण्यासाठी माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांच्याघरी सजून आले होते. वधू कुटुंबीय ऑनलाईन विवाह बघण्यासाठी आल्याची खात्री झाल्यावर पुढील लग्न विधी पार पडला.

टॅग्स :marriageलग्न