शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आजनसरा बॅरेज प्रकल्प 208 कोटींवरून पोहोचला 860 कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षांपर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देना कामाला सुरुवात ना सिंचनाचा लाभ : वीस वर्षांपासून केवळ मिळतात आश्वासनेच

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बरेच प्रकल्प अनेक वर्षे खितपत पडल्याशिवाय पूर्णत्वास गेलेले नाहीत, ही आजपर्यंतची स्थिती राहिली आहे. यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथे वर्धा नदीवर बॅरेज उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. वीस वर्षांपूर्वी या प्रकल्पाकरिता २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. पण, अद्यापही या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. परिणामी या प्रकल्पाची किंमत  ८६० कोटींवर पोहोचली असून हा प्रकल्प होणार नाहीच, अशीच समजूत परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे.हिंगणघाट तालुक्यातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षांपर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये २२.२४ द.ल.घ.मी. पाणी साठविले जाणार असून सिंचन क्षमता २८ हजार ८० हेक्टर आहे. 

आजनसरा बॅरेज प्रकल्प दोन दशकापासून रखडलाहिंगणघाट तालुक्यातील ४० गावे तर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ८ गावांचे सिंचन यामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे १ हजार ८१.३८ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे अधिकार गोठविण्यात आले होते. परंतु प्रकल्पाचे कामच रखडल्याने  शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक अडचणींमुळे उपचाराअभावी काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांच्या मुलांच्या शिक्षणासह विवाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मिळवून शेतजमिनी कसायला सुुरुवात केली. या वीस वर्षांच्या काळात अनेक मंत्री या प्रकल्पाला भेट देऊन गेलेत. त्यांनी वेळोवेळी हा प्रकल्प तत्काळ पूर्ण केला जाईल, असे आश्वासन दिले, पण आता दोन दशक उलटले तरी कामाला सुरुवात झाली नाही. 

पुलगाव बॅरेज प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

निम्न वर्धा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याकरिता पुलगावजवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याकरिता मे २०१० पासून ९६ कोटी रुपयांच्या पुलगाव बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे.  या प्रकल्पामुळे नदी काठच्या १३ गावांना लाभ मिळणार असून २३६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऑक्टोंबर २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रतीकात्मक भूमिपूजन झाले होते. परंतु प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात मे २०१० मध्ये होऊन तीन ते चार वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु शासनाच्या लालफितशाही व संबंधित कंत्राटदार कंपनीला केलेल्या कामाचे देयक न मिळाल्याने काही काळ काम बंद होते. बघता-बघता ९६ कोटींचा हा प्रकल्प तीनशे कोटीच्या पार गेला आहे. या बॅरेजची पाणी साठवण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर असून उंची १४.१७ मीटर तर रुंदी ६.५० मीटर आहे. अतिरिक्त पाणी सोडण्याकरिता  १० बाय ६ फुटाचे पंधरा दरवाजे आहेत. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून १० टक्के काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुलगाव शहरासह केंद्रीय दारूगोळा भंडार व परिसरातील पिपरी, पारगोठाण, धनोडी, रोहणा, विरुळ, सोरटा, रसुलाबाद, मार्डा, गुंजखेडा, नाचणगाव, कवठा, मलकापूर आदी गावांची पाणी समस्या कायमची सुटणार आहे. तसेच ३ हजार २३६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

आजनसरा बॅरेज प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी येईल. परिसरातील ९० टक्के शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेती सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. - प्रशांत संभाजी सुपारे,सोनेगाव (राऊत). 

आजनसरा बॅरेज प्रकल्प हा मृगजळ ठरला आहे. गेल्या वीस वर्षांपासून प्रकल्प होणार आणि आम्ही बागायतदार होऊ अशी आशा लावून बसलो आहे. अनेक मोठे नेते येतात आणि प्रकल्प होणार म्हणून सांगतात. परंतु अजूनही कामात प्रगती नाही. येथील भूमिपूजनाची शिळाही नदीच्या पुरात वाहून गेली आहे.  प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही नेत्यावर विश्वास बसणार नाही.- उमेश शंकर कडवडे, आजनसरा. 

आजनसरा प्रकल्प विदर्भातील महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून पूर्णत्वास गेल्यास हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजनसरा हे श्रीसंत भोजाजी महाराज यांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पामुळे निसर्गावर अवलंबून राहणारे शेतकरी संपन्न होणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे.- विजय कृष्णा परबत, आजनसरा.

आजनसरा बॅरेज प्रकल्पाकरिता पर्यावरण अनुमती आणि वनविभागाची अनुमती मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील वर्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर कार नदी प्रकल्पाच्या कालवा सुधार योजनेची कामे येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. पुढील वर्षी सिंचन क्षेत्रात भरीव वाढ होईल.- मुकुंद सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग वर्धा. 

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प