शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

‘शोषखड्डे’ तयार करून जिल्ह्यात जोपासला जातोय ‘स्वच्छ’चा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून १०८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्ह्यात स्वच्छ भागात मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्थायित्व व सुजलाम् अभियान राबविले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छ व सुंदर गावाच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून गावागावांत सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. आतापर्यंत तब्बल ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून तब्बल १ हजार २८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण होत आहे. अवघ्या १०० दिवसांत तब्बल ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा असून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.आष्टी तालुका अव्वल-    जिल्ह्यात एकूण ५१७ ग्रामपंचायती असून गावपातळीवर सध्या शोषखड्डे तयार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७८९ शोषखड्ड्यांचे काम पूर्ण झाले असून यात सर्वाधिक शोषखड्डे आष्टी तालुक्यातील गावांमध्ये करण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यात आतापर्यंत २०४ शोषखड्ड्यांची कामे पूर्ण झाली असून १०८ शोषखड्ड्यांचे काम युद्धपातळीवर प्रगतीपथावर आहे.

प्रत्येक पंचायत समितीला पाच हजार शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट-    अवघ्या १०० दिवसांत जिल्ह्यात ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा मानस असून जिल्ह्यातील आठही पंचायत समितींना प्रत्येकी ५ हजार शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पंचायत समितींचेही बारकाईने लक्ष आहे.

निरोगी ग्रामस्थांसाठी शोषखड्डे महत्त्वाचे-    नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्याने वाहते. बहुधा सांडपाण्याचे डबके नागरिकांच्या घराशेजारीच साचत असल्याने ग्रामस्थांना डासांच्या त्रासाला तसेच डासांपासून होणाऱ्या कीटकजन्य आजारांना सामोरे जावे लागते. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागावी तसेच निरोगी ग्रामस्थ यासाठी शोषखड्डे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी गावासाठी शोषखड्डे महत्त्वाचे आहेत. शोषखड्ड्यांमुळे सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागत असून  प्रत्येक गावातील नागरिकांनी स्थायित्व व सुजलाम् अभियानात सहभागी होऊन गावात जास्तीतजास्त शोषखड्डे तयार करून सहकार्य करावे.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, वर्धा.

उघड्यावरील सांडपाण्याची गावस्तरावर समस्या असून यापासून नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. स्वच्छ व निरोगी गाव परिसराच्या उद्देशाने प्रत्येक घरी शोषखड्डा नागरिकांनी तयार करावा.- यशवंत सपकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प., वर्धा

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान