शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेती तणमुक्त नव्हे, तर तणनाशकमुक्ती हवी

By admin | Updated: December 4, 2015 02:21 IST

शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते.

उल्हास जाजू : अध्ययन मंदिरामध्ये सेंद्रीय शेतीवर कार्यशाळा; १२ गावांतील १०० वर शेतकऱ्यांचा सहभागसेवाग्राम : शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे तणमुक्ती नव्हे तर तणनाशकमुक्ती हवी, असे मत डॉ. उल्हास जाजू यांनी व्यक्त केले.सेवाग्राम रुग्णालय, सामूदायिक आरोग्य विमा, सेंद्रीय शेती प्रकल्पांतर्गत हमदापूर, मदनी परिसरातील ३० गावांतील शेतकऱ्यांसह आरोग्य तसेच सेंद्रीय शेती विषयावर काम केले जाते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सेवाग्राम येथील अध्ययन मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला दगडकर, वसंत फुटाणे, प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. जाजू म्हणाले की, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून व्रतपूर्वक शेती करणाऱ्या लोकांना या मोहिमेत सहभागी करून सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. याला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. दगडकर यांनी स्वत:च्या शेतीतील तणावर केलेले विविध प्रयोग, अनुभव शेतकऱ्यांसमोर कथन केले. निंदलेले तण आळीपाळीने एका तासातून दुसऱ्या तासात टाकावे. निंदण, डवरणीसोबतच तणनाशक हे शेतीला तारक नसून मारक आहे. स्वच्छ भारत ठिक; पण शेती ही तणाने स्वच्छ करू नये, असे दगडकर यांनी अनुभवातून शेतकऱ्यांना सांगितले. वसंत फुटाणे यांनी तणनाशक फवारणीमुळे उद्भवलेले विविध आजारांवर चित्राद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत हमदापूर, बावापूर, मदनी, तुळजापूर, वघाळा, कुटकी, तळोदी, करंजी भोगे, करंजी काजी, पुजई, हिवरा, टाकळी किटे आदी गावांतील शंभरावर शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे ज्या घटना घडल्या, त्याचे व पुढील पिकाचे नियोजन तसेच तणनाशक दूर ठेवण्यासाठी विविध सेंद्रीय प्रयोगांबाबत दगडकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रकाश डंभारे, डॉ. विठ्ठल, डॉ. सुमीत जाजू, सुरेश बोडखे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)