शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

शेती तणमुक्त नव्हे, तर तणनाशकमुक्ती हवी

By admin | Updated: December 4, 2015 02:21 IST

शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते.

उल्हास जाजू : अध्ययन मंदिरामध्ये सेंद्रीय शेतीवर कार्यशाळा; १२ गावांतील १०० वर शेतकऱ्यांचा सहभागसेवाग्राम : शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे तणमुक्ती नव्हे तर तणनाशकमुक्ती हवी, असे मत डॉ. उल्हास जाजू यांनी व्यक्त केले.सेवाग्राम रुग्णालय, सामूदायिक आरोग्य विमा, सेंद्रीय शेती प्रकल्पांतर्गत हमदापूर, मदनी परिसरातील ३० गावांतील शेतकऱ्यांसह आरोग्य तसेच सेंद्रीय शेती विषयावर काम केले जाते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सेवाग्राम येथील अध्ययन मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला दगडकर, वसंत फुटाणे, प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. जाजू म्हणाले की, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून व्रतपूर्वक शेती करणाऱ्या लोकांना या मोहिमेत सहभागी करून सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. याला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. दगडकर यांनी स्वत:च्या शेतीतील तणावर केलेले विविध प्रयोग, अनुभव शेतकऱ्यांसमोर कथन केले. निंदलेले तण आळीपाळीने एका तासातून दुसऱ्या तासात टाकावे. निंदण, डवरणीसोबतच तणनाशक हे शेतीला तारक नसून मारक आहे. स्वच्छ भारत ठिक; पण शेती ही तणाने स्वच्छ करू नये, असे दगडकर यांनी अनुभवातून शेतकऱ्यांना सांगितले. वसंत फुटाणे यांनी तणनाशक फवारणीमुळे उद्भवलेले विविध आजारांवर चित्राद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत हमदापूर, बावापूर, मदनी, तुळजापूर, वघाळा, कुटकी, तळोदी, करंजी भोगे, करंजी काजी, पुजई, हिवरा, टाकळी किटे आदी गावांतील शंभरावर शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे ज्या घटना घडल्या, त्याचे व पुढील पिकाचे नियोजन तसेच तणनाशक दूर ठेवण्यासाठी विविध सेंद्रीय प्रयोगांबाबत दगडकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रकाश डंभारे, डॉ. विठ्ठल, डॉ. सुमीत जाजू, सुरेश बोडखे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)