शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

शेती तणमुक्त नव्हे, तर तणनाशकमुक्ती हवी

By admin | Updated: December 4, 2015 02:21 IST

शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते.

उल्हास जाजू : अध्ययन मंदिरामध्ये सेंद्रीय शेतीवर कार्यशाळा; १२ गावांतील १०० वर शेतकऱ्यांचा सहभागसेवाग्राम : शेतातील तणामुळे पिकाला आधार होतो. विविध प्रकारचे तण माती सुपिक ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे तणमुक्ती नव्हे तर तणनाशकमुक्ती हवी, असे मत डॉ. उल्हास जाजू यांनी व्यक्त केले.सेवाग्राम रुग्णालय, सामूदायिक आरोग्य विमा, सेंद्रीय शेती प्रकल्पांतर्गत हमदापूर, मदनी परिसरातील ३० गावांतील शेतकऱ्यांसह आरोग्य तसेच सेंद्रीय शेती विषयावर काम केले जाते. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सेवाग्राम येथील अध्ययन मंदिरात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला दगडकर, वसंत फुटाणे, प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. जाजू म्हणाले की, सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून व्रतपूर्वक शेती करणाऱ्या लोकांना या मोहिमेत सहभागी करून सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. याला बऱ्यापैकी प्रतिसादही मिळत आहे. दगडकर यांनी स्वत:च्या शेतीतील तणावर केलेले विविध प्रयोग, अनुभव शेतकऱ्यांसमोर कथन केले. निंदलेले तण आळीपाळीने एका तासातून दुसऱ्या तासात टाकावे. निंदण, डवरणीसोबतच तणनाशक हे शेतीला तारक नसून मारक आहे. स्वच्छ भारत ठिक; पण शेती ही तणाने स्वच्छ करू नये, असे दगडकर यांनी अनुभवातून शेतकऱ्यांना सांगितले. वसंत फुटाणे यांनी तणनाशक फवारणीमुळे उद्भवलेले विविध आजारांवर चित्राद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत हमदापूर, बावापूर, मदनी, तुळजापूर, वघाळा, कुटकी, तळोदी, करंजी भोगे, करंजी काजी, पुजई, हिवरा, टाकळी किटे आदी गावांतील शंभरावर शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांनी तणनाशकामुळे ज्या घटना घडल्या, त्याचे व पुढील पिकाचे नियोजन तसेच तणनाशक दूर ठेवण्यासाठी विविध सेंद्रीय प्रयोगांबाबत दगडकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्रकाश डंभारे, डॉ. विठ्ठल, डॉ. सुमीत जाजू, सुरेश बोडखे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)