शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

ग्रामपंचायतच्या वतीने कृषी विषयक चर्चासत्र

By admin | Updated: May 27, 2014 23:55 IST

खरीप पिकांचे पुनर्नियोजन करण्याच्या उद्देशाने ग्रा.पं. पवनार येथे शेतकरी वर्गासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषीभूषण

पवनार : खरीप पिकांचे पुनर्नियोजन करण्याच्या उद्देशाने ग्रा.पं. पवनार येथे शेतकरी वर्गासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बर्‍हाटे, कृषीभूषण डॉ. नंदकिशोर तोटे, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक निखील रंजन, सरपंच अजय गांडोळे, उपसरपंच जगदीश पेटकर प्रामुख्याने हजर होते.

चर्चासत्रात मार्गदर्शन करताना कृषी अधीक्षक बर्‍हाटे यांनी पेरण्यापूर्वी बीज प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. गत हंगामात अतवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाले. प्रयोगशाळेत परिक्षण केले असता सोयाबीन बियाण्यावर सहा प्रकारची बुरशी आढळून आली असून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया न केल्यास बुरशी वाढून उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता ही जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबतच घरची बियाणे उगवन क्षमता तपासून वापरण्यावरही त्यांनी भर दिला. बँकेकडून दिल्या जाणार्‍या पीक कर्जाचा आढावा घेताना काही जाचक अटीतून शेतकर्‍यांना सुट देण्याची विनंती व्यवस्थापकांना केली. पीक कर्ज घेण्याकरिता बँकांनी फेर फार पंजीची अट टाकली होती. त्या करिता जवळपास दोन आठवडे लागतात. सोबतच १ लाखाच्या वर कर्ज घेतले असता धारकाला डिक्लेरेशन सब रजिस्टार कडे फाईल करावे लागते. याकरिता 0.५ टक्केचा भुर्दंड धारकाला पडतो. त्यावर विचार-विनिमय व्हावा असेही बर्‍हाटे यांनी त्यांनी सुचविले.

चर्चासत्रात अनेक शेतकर्‍यांनी आपल्या अडचणी मांडल्या. यात प्रामुख्याने पीक विमा योजना, गारपीटग्रस्तांना, अतवृष्टीधारकांना मिळणारी मदत, शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या सोयी सुविधा सर्वसाधारण शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्यास येणार्‍या अडचणी हे कळीचे मुद्दे होते. या सर्व बाबींवर प्रकाश टाकत कृषी अधीक्षकांनी शेतकर्‍यांना समाधानकारक उत्तर दिले.

किसान क्रेडिट कार्डचा वापर शेतकर्‍यांकडून होत नसल्याची खंत बँकेचे व्यवस्थापक रंजन यांनी बोलून दाखविली,. या बाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लवकरच मेळाव्याचे आयोजन करुन त्या मेळाव्यामध्ये किसान क्रेडिट कार्डचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा उपयोग शेतकर्‍यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ. तोटे यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी उपस्थितांसमोर मांडल्या. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी सरी वरंबाचा वापर करावा असे आवाहन करून कृषी विभागाने सरी वरंब्याचे यंत्र उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.

ग्रा.पं.च्या वतीने कृषी चर्चासत्राचे प्रथमत: आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी ग्रामपंचायत सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांनी धन्यवाद दिले. चर्चासत्राचे संचालन व आभार श्रीकांत तोटे यांनी केले. चर्चासत्राला परिसरातील अनेक शेतकरी आणि गावातील इतरही नागरिक या चर्चासत्राला उपस्थित होते.(वार्ताहर)