शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देपीक कापणीचा प्रात्यक्षिक अहवाल खोळंबला

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात भाजीकोंडी होऊ देणार नाही असे म्हणत स्वत:ची पाठ थोपाटून घेणाऱ्या कृषी विभागाचा भोंगळ कारभारच या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून येत आहे.गत वर्षी तुरीची ६९ हजार ५०० हेक्टरवर, गहू १७ हजार २७२ हेक्टर तर ३९ हजार ९८० हेक्टरवर चण्याची लागवड झाली होती. तर यंदाच्या वर्षी ६० हजार १३२ हेक्टरवर तुरीची लागवड झाली. शिवाय २२ हजार २१७ हेक्टरवर गहू आणि ४१ हजार ७१४ हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. परंतु, चणा व गहू या पिकाच्या कापणी प्रयोगाची अंतीम आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेला नसल्याने यंदा गहू आणि चण्याचे जिल्ह्यात नेमके किती उत्पादन होईल यापासून कृषी विभाग अनभिज्ञ आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितल्या जात आहे. गत वर्षी हेक्टरी १,१६८ किलो तर यंदाच्या वर्षी हेक्टरी १,२६३ किलो तुरीचा उतारा आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.९,३६८ हेक्टरने तुरीचे क्षेत्र घटलेगत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९ हजार ३६८ हेक्टरने तूर पिकाचे क्षेत्र घटले आहे. तर ४ हजार ९४५ हेक्टरने गहू आणि १ हजार ७१६ हेक्टरने चण्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे नोंद कृषी विभागाने घेतली आहे.बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मळणी शिल्लकसध्यास्थितीत बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या तूर, गहू व चणा या शेतमालाची शिल्लक आहे. असे असले तरी जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे नेमके किती उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यंदाच्या वर्षीचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. परंतु, त्याची पूर्ण माहिती अद्यापही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे उत्पादन नेमके किती झाले हे अद्यापही अस्पष्ट आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्त्वास जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. लॉकडाऊन संपल्यावर आकडेवारी अपडेट होईल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती