शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

गहू, चणा उत्पादनाबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देपीक कापणीचा प्रात्यक्षिक अहवाल खोळंबला

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षीच्या तुलनेत यंदा तूर पिकाचे पिकाचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी घटले आहे. तर गहू व चणा पिकाचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोरोनामुळे शेतीची कामे आणि जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता सर्वच काही टाळेबंद आहेत. पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा १३ दिवसांचा कालावधी संपला असून वर्धा जिल्ह्यात यंदा किती गहू आणि चण्याचे उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नसल्याचे पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात भाजीकोंडी होऊ देणार नाही असे म्हणत स्वत:ची पाठ थोपाटून घेणाऱ्या कृषी विभागाचा भोंगळ कारभारच या निमित्ताने पुढे आल्याचे दिसून येत आहे.गत वर्षी तुरीची ६९ हजार ५०० हेक्टरवर, गहू १७ हजार २७२ हेक्टर तर ३९ हजार ९८० हेक्टरवर चण्याची लागवड झाली होती. तर यंदाच्या वर्षी ६० हजार १३२ हेक्टरवर तुरीची लागवड झाली. शिवाय २२ हजार २१७ हेक्टरवर गहू आणि ४१ हजार ७१४ हेक्टरवर चण्याची लागवड झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. परंतु, चणा व गहू या पिकाच्या कापणी प्रयोगाची अंतीम आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अद्याप प्राप्त झालेला नसल्याने यंदा गहू आणि चण्याचे जिल्ह्यात नेमके किती उत्पादन होईल यापासून कृषी विभाग अनभिज्ञ आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितल्या जात आहे. गत वर्षी हेक्टरी १,१६८ किलो तर यंदाच्या वर्षी हेक्टरी १,२६३ किलो तुरीचा उतारा आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.९,३६८ हेक्टरने तुरीचे क्षेत्र घटलेगत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ९ हजार ३६८ हेक्टरने तूर पिकाचे क्षेत्र घटले आहे. तर ४ हजार ९४५ हेक्टरने गहू आणि १ हजार ७१६ हेक्टरने चण्याचे लागवड क्षेत्र वाढल्याचे नोंद कृषी विभागाने घेतली आहे.बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या शेतमालाची मळणी शिल्लकसध्यास्थितीत बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांच्या तूर, गहू व चणा या शेतमालाची शिल्लक आहे. असे असले तरी जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे नेमके किती उत्पादन होईल याची आकडेवारीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे नाही. त्यामुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यंदाच्या वर्षीचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. परंतु, त्याची पूर्ण माहिती अद्यापही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात यंदा गहू आणि चण्याचे उत्पादन नेमके किती झाले हे अद्यापही अस्पष्ट आहे. लॉकडाऊनमुळे कामे पूर्णत्त्वास जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. लॉकडाऊन संपल्यावर आकडेवारी अपडेट होईल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती