शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:55 IST

देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : शेतकरी हितार्थ योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमतदेवळी : देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचीही गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ सरकार विविध योजना राबवित असून त्याचा कृषी विभागाने गरजू शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते स्थानिक नगर भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पं. स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न. प. उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, कृषी विभागाचे उपसंचालक जी. आर. कापसे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे सुरेश नेमाडे, सेलसुरा येथील कृषी केंद्राचे डॉ. प्रशांत उंबरकर, मत्स्य विकासचे सहायक आयुक्त एस. बी. डोंगरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय खोपडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, दीपक फुलकरी, अमृत झाडे, गुरुसिंग पाखल, मनोज सोणवने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, देशातील शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी शेतकºयांनीही केवळ शेतीच्या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली पाहिजे. देशातील शेतकºयांची स्थिती आज दयनिय आहे. सर्वप्रकारे आज शेतकरी भरडला जात असल्याने शेतकºयांनी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, दुधाळ जनावरे पालन आदी शेतीला पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. सदर व्यवसायांसाठी सरकारच्यावतीने विविध योजनाही राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.हवालदिल शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नसून शेतकºयांनी आपली शेती आपणच घडविली पाहिजे. शेतीतील नवनवीन प्रयोगाबाबत खात्री पटली तरच ते तंत्रज्ञान किंवा ते प्रयोग शेतकरी स्वीकारतात. त्या दृष्टीकोनातून कृषी विज्ञान केंद्रामध्ये करण्यात येणाºया कृषी विषयक प्रयोगाबाबत शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी एस. बी. डोंगरे, कापसे, सुरेश नेमाडे, प्रशांत उंबरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी अमृत झाडे व गुरुसिंग पाखल यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी झाडे व पाखल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तालुक्यातील दहा शेतकºयांना कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी नगर परिषद शाळा येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संजय तिवारी, रामचंद्र सोनसळ आदी उपस्थित होते. यावेळी लावण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाची मान्यवरांसह शेतकºयांनी पाहणी करीत साहित्य खरेदी केले.