शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:55 IST

देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : शेतकरी हितार्थ योजनांची दिली माहिती

आॅनलाईन लोकमतदेवळी : देशातील जनतेला गरीबी पासून मुक्ती द्यावयाची असेल तर कृषी क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचीही गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ सरकार विविध योजना राबवित असून त्याचा कृषी विभागाने गरजू शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते स्थानिक नगर भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पं. स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न. प. उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, तहसीलदार तेजस्विनी जाधव, कृषी विभागाचे उपसंचालक जी. आर. कापसे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे सुरेश नेमाडे, सेलसुरा येथील कृषी केंद्राचे डॉ. प्रशांत उंबरकर, मत्स्य विकासचे सहायक आयुक्त एस. बी. डोंगरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय खोपडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, दीपक फुलकरी, अमृत झाडे, गुरुसिंग पाखल, मनोज सोणवने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, देशातील शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी शेतकºयांनीही केवळ शेतीच्या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली पाहिजे. देशातील शेतकºयांची स्थिती आज दयनिय आहे. सर्वप्रकारे आज शेतकरी भरडला जात असल्याने शेतकºयांनी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, दुधाळ जनावरे पालन आदी शेतीला पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. सदर व्यवसायांसाठी सरकारच्यावतीने विविध योजनाही राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ शेतकºयांनी घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.हवालदिल शेतकºयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नसून शेतकºयांनी आपली शेती आपणच घडविली पाहिजे. शेतीतील नवनवीन प्रयोगाबाबत खात्री पटली तरच ते तंत्रज्ञान किंवा ते प्रयोग शेतकरी स्वीकारतात. त्या दृष्टीकोनातून कृषी विज्ञान केंद्रामध्ये करण्यात येणाºया कृषी विषयक प्रयोगाबाबत शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी एस. बी. डोंगरे, कापसे, सुरेश नेमाडे, प्रशांत उंबरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी अमृत झाडे व गुरुसिंग पाखल यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान खा. तडस व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी झाडे व पाखल यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात तालुक्यातील दहा शेतकºयांना कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांनाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी नगर परिषद शाळा येथून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला संजय तिवारी, रामचंद्र सोनसळ आदी उपस्थित होते. यावेळी लावण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाची मान्यवरांसह शेतकºयांनी पाहणी करीत साहित्य खरेदी केले.