शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शेतीविषयक अद्ययावत ज्ञान आवश्यक

By admin | Updated: March 22, 2015 01:45 IST

आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या ....

वर्धा : आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे दिसते. शेतकरी हा सुखी समाधानी होऊन देशाचा खरा आधार स्तंभ व समृद्ध बनावा यासाठी प्रशिक्षण वर्ग आवश्यक असल्याचे मत जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांनी व्यक्त केले.गतिमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपिनकुमार राठोड, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी मोर्घे, मुडे, तेलंगे उपस्थित होते. यानंतर बोलताना राठोड म्हणाले, शेतकऱ्याला संकटाशी लढण्याची जिद्द व ताकद निर्माण व्हावी याकरिता योजना आहेत. या प्रशिक्षणामार्फत अद्यावत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवाला कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कडधान्य विकास कार्यक्रम तसेच वी.आय.आय.डी.पी. अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमात एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे, पं.स. सदस्य विमल वरभे, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, सरपंच अतुल तिमांडे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)