शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

साई यात्रा महोत्सवात कृषी मार्गदर्शन व मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:07 IST

श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सल्ला : कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व यात्रा समितीचा संयुक्त उपक्रम

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोहर मंगरूळकर तर मार्गदर्शक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, अतिथी म्हणून जि.प. शिक्षण आरोग्य सभापती जयश्री गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. मुडे, पं.स. कृषी अधिकारी राऊत उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदर योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. उंबरकर यांनी सध्या शेतकऱ्यांची समस्या असलेल्या बोंडअळीचे आक्रमण यावर सविस्तर माहिती दिली. ३ डिसेंबरच्या शेवटपर्यंत बाधित कपाशीचे पीक नष्ट करावे. यामुळे पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होणार नाही, असेही सांगितले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी बोरगाव, सुनील भालेराव पेठ यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले. संचालन मोहीन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक बावनकर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृषी सहायक रोहन अवचार, वहाने, निमजे, विजय गोमासे, संतोष बालपांडे, सुरेश गिरडकर, सुनील हंबर्डे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला आंजी (मो.) आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यामध्ये कृषी विभाग तथा विविध संस्था, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनाचे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला भेट देत अधिकारी व शेतकऱ्यांनी पिकांबाबत माहिती जाणून घेतली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारचे आयोजन केल्याने नागरिकांनीही बोध घेतला.प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना मिळाले नवे ज्ञानश्री संत साई यात्रा महोत्सवाचे निमित्त साधून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा तथा यात्रा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. यात कृषी विभाग, संस्था व प्रगतशील शेतकºयांनी उत्पादनाचे प्रदर्शनही लावले होते. या प्रदर्शनातून शेतकºयांना नवे ज्ञान प्राप्त करता आले.