शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

साई यात्रा महोत्सवात कृषी मार्गदर्शन व मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:07 IST

श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सल्ला : कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व यात्रा समितीचा संयुक्त उपक्रम

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोहर मंगरूळकर तर मार्गदर्शक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, अतिथी म्हणून जि.प. शिक्षण आरोग्य सभापती जयश्री गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. मुडे, पं.स. कृषी अधिकारी राऊत उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदर योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. उंबरकर यांनी सध्या शेतकऱ्यांची समस्या असलेल्या बोंडअळीचे आक्रमण यावर सविस्तर माहिती दिली. ३ डिसेंबरच्या शेवटपर्यंत बाधित कपाशीचे पीक नष्ट करावे. यामुळे पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होणार नाही, असेही सांगितले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी बोरगाव, सुनील भालेराव पेठ यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले. संचालन मोहीन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक बावनकर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृषी सहायक रोहन अवचार, वहाने, निमजे, विजय गोमासे, संतोष बालपांडे, सुरेश गिरडकर, सुनील हंबर्डे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला आंजी (मो.) आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यामध्ये कृषी विभाग तथा विविध संस्था, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनाचे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला भेट देत अधिकारी व शेतकऱ्यांनी पिकांबाबत माहिती जाणून घेतली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारचे आयोजन केल्याने नागरिकांनीही बोध घेतला.प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना मिळाले नवे ज्ञानश्री संत साई यात्रा महोत्सवाचे निमित्त साधून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा तथा यात्रा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. यात कृषी विभाग, संस्था व प्रगतशील शेतकºयांनी उत्पादनाचे प्रदर्शनही लावले होते. या प्रदर्शनातून शेतकºयांना नवे ज्ञान प्राप्त करता आले.