शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साई यात्रा महोत्सवात कृषी मार्गदर्शन व मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:07 IST

श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना सल्ला : कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व यात्रा समितीचा संयुक्त उपक्रम

आॅनलाईन लोकमतआंजी (मोठी) : श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मनोहर मंगरूळकर तर मार्गदर्शक म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत उंबरकर, अतिथी म्हणून जि.प. शिक्षण आरोग्य सभापती जयश्री गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. मुडे, पं.स. कृषी अधिकारी राऊत उपस्थित होते.शेतकºयांना मार्गदर्शन करताना भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदर योजनांचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. उंबरकर यांनी सध्या शेतकऱ्यांची समस्या असलेल्या बोंडअळीचे आक्रमण यावर सविस्तर माहिती दिली. ३ डिसेंबरच्या शेवटपर्यंत बाधित कपाशीचे पीक नष्ट करावे. यामुळे पुढील वर्षी हा प्रादुर्भाव होणार नाही, असेही सांगितले.याप्रसंगी प्रगतशील शेतकरी मुरलीधर चौधरी बोरगाव, सुनील भालेराव पेठ यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुनील गफाट यांनी केले. संचालन मोहीन शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार दीपक बावनकर यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाकरिता मंडळ कृषी अधिकारी भाष्कर मेघे, कृषी सहायक रोहन अवचार, वहाने, निमजे, विजय गोमासे, संतोष बालपांडे, सुरेश गिरडकर, सुनील हंबर्डे आदींनी सहकार्य केले. मेळाव्याला आंजी (मो.) आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यामध्ये कृषी विभाग तथा विविध संस्था, शेतकऱ्यांनी विविध पीक उत्पादनाचे प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनाला भेट देत अधिकारी व शेतकऱ्यांनी पिकांबाबत माहिती जाणून घेतली. यात्रा महोत्सवात अशा प्रकारचे आयोजन केल्याने नागरिकांनीही बोध घेतला.प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना मिळाले नवे ज्ञानश्री संत साई यात्रा महोत्सवाचे निमित्त साधून कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व आत्मा तथा यात्रा समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. यात कृषी विभाग, संस्था व प्रगतशील शेतकºयांनी उत्पादनाचे प्रदर्शनही लावले होते. या प्रदर्शनातून शेतकºयांना नवे ज्ञान प्राप्त करता आले.