शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील गोलबाजारात अग्नितांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते.

ठळक मुद्दे२२ हातगाड्यांसह २४ दुकाने खाक : छोट्या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरतील मुख्य बाजारपेठ भागातील गोलबाजार परिसरात रविवारी सकाळी  ९ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात २४ दुकानातील साहित्य तसेच तब्बल २२ हातगाड्या जळून कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानांना अचानक आग लागली. अवघ्या काही क्षणातच आगीने दुकानातील तसेच दुकानाबाहेरील साहित्यांना आपल्या कवेत घेत रौद्ररूप धारण केले होते. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती मिळताच खा. रामदास तडस, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, न.प. मुख्याधिकारी विपिन पालिवाल, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तर मारोती वाघाडे, किशोर गाडेवान, चंदू तपासे यांनी पंचनामा केला.

गल्ल्यातील रोकडीचाही झाला कोळसाअचानक लागलेल्या आगीत दुकानातील विविध साहित्यासह गल्ल्यातील रोकडीचाही जळून कोळसा झाल्याने या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

श्वानाच्या चार पिल्लांचा होरपळून मृत्यूअचानक लागलेल्या आगीत श्वानाच्या चार पिल्ल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याची नोंदही पंचनामा करते वेळी पोलिसांनी घेतली आहे.

अचानक लागलेल्या आगीचे कारण गुलदस्त्यात या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली असली तरी आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

या व्यक्तींची जळाली दुकानेगोलबाजार परिसरात लागलेल्या आगीत सुशील देशभ्रतार, राजेंद्र खेकडे, बबन ठाकरे, प्रफुल्ल भोयर, प्रमोद भोयर, गजानन आडे, माणिक ठेंगळे, वहिद खान गफ्फार खान, राजेश संगलनी, असलम बेग मिर्झा बेग, कमलेश चकोले, राजू हरजे, मोहम्मद अंसार शेख, मनोज भेंडारे, रामकिशन गुप्ता, रवींद्र वैद्य, अविनाश बंडेवार, आशिष लोणकर, अशोक भोवरे, वसंता पिंपळे, प्रेमचंद गुल्हाणे, रामू शेंडे, शेख इमान शेख सत्तार कुरेशी, शेख शाहरुख कुरेशी यांच्या दुकानातील संपूर्ण साहित्य जळून कोळसा झाले.

या व्यक्तींची जळाली हातगाडीअचानक लागलेल्या आगीत किरण गुजर, दिनकर ढोबळे, साजीद सय्यद सईद सय्यद, नीरज हरगे, तन्वीर बेग अस्लम बेग, मुबारक मेहबूब कुरेशी, शेख आदील शेख सलीम, भागवत म्हस्के, संतोष लोहकरे, शरद पाटील, राहुल कांबळे, केशव ठाकरे, मयूर तिवस्कर, महेश खेकडे, आकाश शेंडे, सतीश दांडेकर, सुदेश मून, जुनेस शेख हुसेन, गौरव पांडे, अमोल देशभ्रतार, सुनील हरगे, तौसिफ खान करिम खान यांच्या हातगाडीसह हातगाडीवरील संपूर्ण साहित्य जळाले.

 

टॅग्स :fireआग