शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: सियालकोटच्या लुनी इथला दहशतवादी तळ भारताने केला उद्ध्वस्त
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
5
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
6
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
7
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
8
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
9
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
10
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
11
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
12
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
13
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
14
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
15
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
16
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
17
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
18
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
19
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
20
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी

संथारा निर्णयाविरोधात सकल जैन समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 25, 2015 02:37 IST

जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात

वर्धा : जैन धर्मात वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या संथारा व्रतावर राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील सकल जैन समाजाच्यावतीने सोमवारी वर्धा, हिंगणघाट व पुलगाव शहरातून शांती मार्र्च काढण्यात आला. या माध्यमातून सदर निर्णयात केंद्र शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्याकरिता वर्धेत जिल्हाधिकारी, हिंगणघाट येथे उपविभागीय अधिकारी तर पुलगाव येथे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवदेन केंद्र शासनाकडे पाठविण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर केंद्र शासनाने हस्तक्षेत करून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय यात विविध धार्मिक व कायद्याच्या बाबीवरही माहिती देण्यात आली आहे. वर्धेतील अनेकांत स्वाध्याय मंदिरातून काढण्यात आलेला शांतीमार्च इंदिरा मार्केट, सोशालिस्ट चौक, मारवाडी मोहल्ला, आंबेडकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी संबंधीत मागण्याचे निवदेन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना सोपविण्यात आले. निवेदन देतेवेळी जैन श्वेतांबर चंद्रप्रभु मंदिरचे ट्रस्टी योगेश फत्तेपुरिया, सुपार्श्वनाथ दिगांबर जैनचे अध्यक्ष सतीश रोडे, नगरसेविका लता जैन, वर्धमान स्थानिक श्रावक जैन संघाचे अध्यक्ष निर्मल चोरडिया, भारत जैन महामंडळचे अध्यक्ष महावीर पाटणी, महावीर दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष सुनील मांडवगडे, नवखंड, पद्मावती सहित पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिरचे अध्यक्ष राजेश भुसारी, भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष नरेंद्र भागवतकर, जैन सैतवाल संगघटनाचे अध्यक्ष नितीन भागवतकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.(प्रतिनिधी) तहसीलदारांना निवेदन पुलगाव : उच्च न्याययालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुलगावातही सकल जैन समाजाने सकाळी शांतीमार्च काढून नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले. सकाळी स्थानिक महावीर भवनात नमोकार मंत्राचा जाप करून निघालेल्या शांतीमार्चमध्ये भारतीय जैन संघटना स्थानिकवासी श्रावक संघ, दिगंबर जैन महासमिती, सैतवाल दिगंबर जैन संघटन, खंडेलवाल दिगंबर जैन समाज इत्यादी जैन संघटनांचा समावेश होता. तहसीलदारांना प्रा. प्रकाशचंद्र श्रीश्रीमाल, सुभाष झांझरी, प्रफुल दर्डा, अश्विन शाह, सुभाष लुंकड, अतुल पडधारीया, पंकज श्रीश्रीमाल , प्रभाकर शहाकार यांच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सोमवारी दुपारपर्यंत समाज बांधवांची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.(तालुका प्रतिनिधी)एसडीओंना निवेदन हिंगणघाट : येथील जैन मंदिरातून निघालेला शांतीमार्च उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी उपविभागीय अधिकारी भुगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी दिनेश कोचर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, अनिल कोठारी, राजेंद्र डागा, अशोक गांधी, शांतीलाल कोचर, श्रीचंद कोचर, हरीष कासवा, राजेश कोचर, शेखर चोरडिया, अरूण बैद, तेजमल गांधी, विजय मुभ्भा, नितीन लुनावत, सुभाष कटारीया, रूपेश लोढा, सुनील पितलिया, डॉ. राहुल मरोठी, पंकज कोचर, अनु मुनोत आदी दिगांबर, स्वेताबंर व स्थानकवासी जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी होते.(तालुका प्रतिनिधी)