शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

तीन दिवसानंतरही मनात आगीची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 20:40 IST

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेशन चौकात लागलेल्या आगीत पाच दुकानासह दोन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत व्यापाऱ्यांचे जवळपास ७ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांमध्ये संताप : उघड्या डोळ्यांनी उद्ध्वस्त होणारा व्यवसाय बघणाºयांवरच केले गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्टेशन चौकात लागलेल्या आगीत पाच दुकानासह दोन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत व्यापाऱ्यांचे जवळपास ७ कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई व शासकीय मदत मिळणे तर दुरच,पण पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत तीन व्यावसायिकांसह अन्य २२ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.आगीने जवळपास सात कोटींचे नुकसान केल्यामुळे व्यापारपेठेतील व्यावसायीक चांगलेच व्यथीत झाले आहे. स्टेशन चौकातील व्यापारपेठेत या घटनेचा कमालीचा परिणाम दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने कर्तव्यात कसर ठेवल्याचा तर पोलीस प्रशासनाने चोर सोडून सन्यासाला फाशी देण्याचा प्रकार अंगिकारुन दंडुकेशाही केल्याचा आरोप नागरिकांकडून केल्या जात आहे. नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाची वाईट अवस्था यावेळी दिसून आली. जर पालिकेच्या अग्नीशामक यंत्रणेने तातडीने दखल घेतली असती तर या आगीने सौम्यरूप घेऊन नुकसान टळले असते. ही आग फटाक्यांच्या ठिणगीने लागल्याची चर्चा असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या अग्नीशामक दलाचे जवान व माजी सैनिकांनी अथक परिश्रम घेतले.तर स्टेशन चौकातील युवा व्यापाऱ्यांनी व सामाजिक दायित्वाच्या भावनेतून काही समाज सेवकांनीही हातभार लावला. रात्री ग्रस्तीवर असणाऱ्या पोलीसांनी घटनेच्या वेळी बंदोबस्त ठेवून जमावावर संतुलीतपणे नियंत्रण ठेवण्यापेक्षा आग पाहण्यासाठी आलेल्या मंडळीसमोर आपल्या अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केल्याने काही व्यापाऱ्यांचा मालही लंपास झाल्याची चर्चा आहे. जळालेल्या अवशेषांपैकी काही अवशेष संधीसाधू मंडळींनी लंपास केल्याचीही चर्चा आहे.आमदारांनी जाणल्या व्यथाआमदार रणजीत कांबळे यांनी शनिवारी आगग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेतली. यावेळी व्यापाºयांनी समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांशी चर्चा करुन आगग्रस्तांना आपादग्रस्त निधीतून मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आ. कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारुलता टोकस यांनी आगग्रस्तांची भेट घेवून व्यथा जाणून घेतल्या.

टॅग्स :fireआग