शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटींच्या योजनेनंतरही तहान कायम

By admin | Updated: May 24, 2015 02:27 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला.

योगेश वरभे अल्लीपूरमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला. याला चार वर्षांचा कालावधी होत असला तरी योजनेतील पाण्याचा एकही थेंब गावकऱ्यांच्या नळाला पोहोचला नाही. यामुळे पाणी टंचाईचे चटके या गावातील नागरिकांना सोसावे लागत आहे. या योजनेत वर्धा नदीच्या कात्री येथील डोहातून पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. याकरिता टाकण्यात येणार असलेली पाईप लाईन व शुद्धीकरणाकरिता उभारण्यात येणार असलेल्या फिल्टर प्लॉन्टच्या टाकीचे काम अद्यापही अपूर्णच आहे.मनसावळी, भगवा, काचनगाव, पवनी, अलमडोह, अल्लीपूर, मार्वी ही सात गावे प्राधिकरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्यासाठी गावात रोज तंटे होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या २ लाख २६ हजार लीटर क्षमतेच्या टाकीच्या जोरावर गावकऱ्यांची तहाण भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टाकीत यशोदा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे. यात ऐन पाणी टंचाईच्या तोंडावर कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने यशोदा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना शेवटचे आचके घेत आहे. गावात १४ सार्वजनिक विहिरी असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात क्षार आहे. यातील पाणी नागरिकांकडून वापराकरिता घेण्यात येत आहे; मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. महिलांचे पिण्याच्या पाण्याकरिता हाल होत आहे. पवनी येथील विहीर, यशोदा नदी, जीवन प्राधिकरण योजना आदी पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आता धोक्यात आले आहे. यशोदा नदीचे पाणी कोल्हापूरी बंधाऱ्यातून सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. प्राधिकरणचे पाणी गावात कात्री येथून येत आहे. यात जागोजागी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज, भारनियमन व अपूर्ण काम यामुळे गत महिन्यापासून गावात तीव्र पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.विठ्ठल मंदिर भवानी वॉर्ड, गाळोबा वॉर्ड, सदानंद वॉर्डातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. ग्रा.पं. प्रशासनाला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महिला व नागरिकांनी ग्रा.पं. वर धडक दिली. यावेळी नागरिकांनी पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी लावून धरली होती.