शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

आठ कोटींच्या योजनेनंतरही तहान कायम

By admin | Updated: May 24, 2015 02:27 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला.

योगेश वरभे अल्लीपूरमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला. याला चार वर्षांचा कालावधी होत असला तरी योजनेतील पाण्याचा एकही थेंब गावकऱ्यांच्या नळाला पोहोचला नाही. यामुळे पाणी टंचाईचे चटके या गावातील नागरिकांना सोसावे लागत आहे. या योजनेत वर्धा नदीच्या कात्री येथील डोहातून पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. याकरिता टाकण्यात येणार असलेली पाईप लाईन व शुद्धीकरणाकरिता उभारण्यात येणार असलेल्या फिल्टर प्लॉन्टच्या टाकीचे काम अद्यापही अपूर्णच आहे.मनसावळी, भगवा, काचनगाव, पवनी, अलमडोह, अल्लीपूर, मार्वी ही सात गावे प्राधिकरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्यासाठी गावात रोज तंटे होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या २ लाख २६ हजार लीटर क्षमतेच्या टाकीच्या जोरावर गावकऱ्यांची तहाण भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टाकीत यशोदा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे. यात ऐन पाणी टंचाईच्या तोंडावर कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने यशोदा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना शेवटचे आचके घेत आहे. गावात १४ सार्वजनिक विहिरी असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात क्षार आहे. यातील पाणी नागरिकांकडून वापराकरिता घेण्यात येत आहे; मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. महिलांचे पिण्याच्या पाण्याकरिता हाल होत आहे. पवनी येथील विहीर, यशोदा नदी, जीवन प्राधिकरण योजना आदी पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आता धोक्यात आले आहे. यशोदा नदीचे पाणी कोल्हापूरी बंधाऱ्यातून सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. प्राधिकरणचे पाणी गावात कात्री येथून येत आहे. यात जागोजागी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज, भारनियमन व अपूर्ण काम यामुळे गत महिन्यापासून गावात तीव्र पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.विठ्ठल मंदिर भवानी वॉर्ड, गाळोबा वॉर्ड, सदानंद वॉर्डातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. ग्रा.पं. प्रशासनाला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महिला व नागरिकांनी ग्रा.पं. वर धडक दिली. यावेळी नागरिकांनी पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी लावून धरली होती.