शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

महासंघाचा मुहूर्त दिवाळीनंतरच

By admin | Updated: October 30, 2015 02:34 IST

दिवाळी तोंडावर आली आहे. सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांना कापाशीकडून आशा आहे.

व्यापाऱ्यांकडून कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर सेलू : दिवाळी तोंडावर आली आहे. सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांना कापाशीकडून आशा आहे. मात्र शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापाऱ्यांच्या खरेदीवरच शेतकऱ्यांची आशा आहे. पणन महासंघाची खरेदी गतवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनंतरच सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे. कापसाचा हमीभाव ४ हजार १०० रुपये जाहीर झाला. सद्या खाजगी जिनिंग प्रेसींग मालक व व्यापारी हमीभावापेक्षा जास्त रुपये दर देत कापूस खरेदी करीत आहेत. सद्या नाममात्र कापूस निघाल्याने भाव हमीभावापेक्षा व्यापारी जास्त देतात; मात्र कापसाची आवक एकदम वाढल्यास व्यापारी भाव पाडणार, हे नेहमीचेच आहे. यामुळे शासनाने खरेदी सुरू केल्याच त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. यामुळे शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.पणन महासंघ व सीसीआय अंतर्गत कापूस खरेदी केंद्र प्रत्येक ठिकाणी सुरू झाल्यास व्यापाऱ्यांची मनमानी थांबेल. हमीभावापेक्षा व शासकीय दर लक्षात घेवून व्यापाऱ्यांना जास्त भाव दिल्याशिवाय कापूस मिळणार नाही हे वास्तव आहे. शासनाच्या धोरणात कदाचित शेतकऱ्यांची किव आल्यास बोनस ही मिळू शकतो. खाजगी व्यापाऱ्याकडून ती अपेक्षा नसते. मात्र दिवाळी तोंडावर आली असताना शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना यंदा सोयाबीनने दगा दिला. कुणाला एकरी एक किंवा दोन पोते तर काहींना पसाभरही झाले नाही. प्रचंड तोटा लागला. शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट विस्कटले व हातात अपेक्षित असलेला पैसाच नसल्याने बाहेरच्यांची चीवचीव वाढली.