शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:07 IST

शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते.

ठळक मुद्दे‘दिशा’ सामाजिक संस्थेचा पाठपुरावा : बसचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. परंतु गावात तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा बस सुरू झाली.गावातील खडतर रस्ता आणि रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे १२ वर्षापूर्वी बस सेवा बंद झाली. ‘दिशा’ प्रकल्पाचे काम गावात मार्च २०१७ मध्ये सुरू झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सोबत भेटी व बैठका घेतल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची एक मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ८ व्या वर्गानंतर पुढील शिक्षणाकरिता शहरात जावे लागते. बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थिनी शाळा सोडत आहे. पुढील शिक्षण घेत नसल्याचे समजले.नटाळा आणि बोथली गावातील पालक, ग्रामस्थ, शाळा आणि विद्यार्थी यांना एका माळेत आणण्यासाठी दिशा टिम ने पुढाकार घेतला. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी एकत्रित पणे जो लढा सुरू केला त्याला आज यश मिळाले. १२ वर्षानंतर गावात बस सेवा सुरू झाली. बस सेवा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीचे माजी सदस्य अजय पालीवाल, सरपंच शिला राऊत, उपसरपंच ताराचंद मसराम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच रेखा यन्ने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय होलगिरवार आणि सर्व सदस्य तसेच राज्य व्यवस्थापक दिशा प्रकल्प महाराष्ट्र निक्की जयश्री परमानंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल उके, वैशाली मेश्राम, पुजा बेदरे, शुभम बेदरे व दिशा युथ क्लबचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले,

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ