शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:07 IST

शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते.

ठळक मुद्दे‘दिशा’ सामाजिक संस्थेचा पाठपुरावा : बसचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. परंतु गावात तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा बस सुरू झाली.गावातील खडतर रस्ता आणि रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे १२ वर्षापूर्वी बस सेवा बंद झाली. ‘दिशा’ प्रकल्पाचे काम गावात मार्च २०१७ मध्ये सुरू झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सोबत भेटी व बैठका घेतल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची एक मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ८ व्या वर्गानंतर पुढील शिक्षणाकरिता शहरात जावे लागते. बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थिनी शाळा सोडत आहे. पुढील शिक्षण घेत नसल्याचे समजले.नटाळा आणि बोथली गावातील पालक, ग्रामस्थ, शाळा आणि विद्यार्थी यांना एका माळेत आणण्यासाठी दिशा टिम ने पुढाकार घेतला. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी एकत्रित पणे जो लढा सुरू केला त्याला आज यश मिळाले. १२ वर्षानंतर गावात बस सेवा सुरू झाली. बस सेवा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीचे माजी सदस्य अजय पालीवाल, सरपंच शिला राऊत, उपसरपंच ताराचंद मसराम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच रेखा यन्ने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय होलगिरवार आणि सर्व सदस्य तसेच राज्य व्यवस्थापक दिशा प्रकल्प महाराष्ट्र निक्की जयश्री परमानंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल उके, वैशाली मेश्राम, पुजा बेदरे, शुभम बेदरे व दिशा युथ क्लबचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले,

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ