शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षानंतर नटाळा गावात पोहोचली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:07 IST

शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते.

ठळक मुद्दे‘दिशा’ सामाजिक संस्थेचा पाठपुरावा : बसचे नागरिकांनी केले जल्लोषात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरापासून अवघ्या ३५ कि़मी. अंतरावर असलेल्या नटाळा गावातील विद्यार्थ्यांना नियमित शाळेत, कॉलेज मध्ये जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत होता. गावात बस येत नसल्यामुळे शहरासोबत संपर्क नसल्या सारखा होता गावातील विद्यार्थ्यांना पायी किंवा मिळेल त्या साधनानी शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते. परंतु गावात तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा बस सुरू झाली.गावातील खडतर रस्ता आणि रस्त्याचे बांधकाम व्यवस्थित नसल्यामुळे १२ वर्षापूर्वी बस सेवा बंद झाली. ‘दिशा’ प्रकल्पाचे काम गावात मार्च २०१७ मध्ये सुरू झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी सोबत भेटी व बैठका घेतल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांची एक मुख्य समस्या समोर आली ती म्हणजे ८ व्या वर्गानंतर पुढील शिक्षणाकरिता शहरात जावे लागते. बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थिनी शाळा सोडत आहे. पुढील शिक्षण घेत नसल्याचे समजले.नटाळा आणि बोथली गावातील पालक, ग्रामस्थ, शाळा आणि विद्यार्थी यांना एका माळेत आणण्यासाठी दिशा टिम ने पुढाकार घेतला. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी, पालकांनी एकत्रित पणे जो लढा सुरू केला त्याला आज यश मिळाले. १२ वर्षानंतर गावात बस सेवा सुरू झाली. बस सेवा उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीचे माजी सदस्य अजय पालीवाल, सरपंच शिला राऊत, उपसरपंच ताराचंद मसराम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच रेखा यन्ने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय होलगिरवार आणि सर्व सदस्य तसेच राज्य व्यवस्थापक दिशा प्रकल्प महाराष्ट्र निक्की जयश्री परमानंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रफुल्ल उके, वैशाली मेश्राम, पुजा बेदरे, शुभम बेदरे व दिशा युथ क्लबचे सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले,

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ