शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आठवडी बाजारातूनही बोंडअळी निर्मूलनावर सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:22 IST

गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, ......

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत बैठक : लहान शेतकरी केंद्रस्थानी ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी कापूस पट्टयातील जिल्ह्यात कपाशी पिकांवर बोंडअळी व शेंदरी अळी यांचे आक्रमण झाले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी यापासून बचाव करण्यासाठी मोठे गाव, आठवडी बाजाराच्या दिवशी सामान्य शेतकऱ्यांना दवंडी देवून त्यांच्याच बोलीभाषेत बोंडअळी निर्मूलनाबाबतची माहिती पोहचवा असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी दिले आहे.या कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संघटना, ग्रामपंचायती यांचीही मदत घ्या,अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद कृषी विभागाने जनजागृती रथ तयार केला आहे. त्या रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचारासाठी रवाना करण्यात आले. जिल्हा परिषदेत मंगळवारी या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी, अश्विनी भोपळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कापसे, विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी धर्माधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांनी नियोजन हाती घेतले आहे. बोंडअळी नियंत्रणाकरिता कपाशीची लागवड होताच, पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होताच बोंडअळीची अंडी इतर बाबीची पाहणी सुरू करून अळींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पातळीवर आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत तपशीलवार माहिती, उपसंचालक कापसे यांनी दिली. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी आवश्यक असणारे सर्व फेरोगेन सापळे व किटकनाशके आवश्यक त्या प्रमाणात महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाच्या तालुका वितरकांकडे व कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीकरिता ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जन जनजागृती विविध माध्यमातून केली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही विभागाच्या पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यास जबाबदारी सोपवून त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी नियोजनानुसार अहवाल दररोज द्यावा अशी सूचना करण्यात आली.कपाशीच्या बाजूला भेंडी, अंबाडी लावाबी.टी. कपाशीच्या सभोवताल नॉन बी.टी. कपाशीच्या आश्रित ओळी लावणे, पिकांसभोवताल कपाशीच्या कुळातील भेंडी, अंबाडी ही सापळा पिके लावणे, कपाशीला पाने, फुले व बोंड लागण्यास सुरूवात होण्यापूर्वीच शेंदरी बोंडअळीची अंडी व छिद्रे यांची नियमित पाहणी करणे, अर्धवट उमललेली गुलाबाच्या कळीसारखी दिसणारी फुले तोडून नष्ट करणे, पिकामध्ये हेक्टरी २ फेरोगोन सापळे लावावे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी